शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘नियोजन’च्या तेरा जागा संयुक्त आघाडीच्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:46 IST

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत तांत्रिक कारणांमुळे काही अर्ज राहिले.

ठळक मुद्दे विलासराव शिंदे, मोहनराव कदम : गटबाजी नाही; ६० सदस्य भाजप आणि दोन्ही काँग्रेसबरोबरचअर्ज माघारीची चर्चा सुरू होती, या कारणामुळे काही अर्ज राहिले आहेत. आघाडीच्या तेरा उमेदवारांची नावेही जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत तांत्रिक कारणांमुळे काही अर्ज राहिले. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी संयुक्त आघाडीच्याच तेरा जागा असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले. आघाडीच्या तेरा उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली. नेते आणि सदस्यांमध्ये कोणतीही गटबाजी नसून साठही सदस्य आमच्यासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नियोजन समिती निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची लांबणीवर पडलेली बैठक शुक्रवारी पार पडली. निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे. या आघाडीतील तेरा उमेदवारांची नावेही जाहीर केली. सर्वसाधारण गटातून सतीश पवार, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी, शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, विक्रम सावंत असे सहा, तर महिला गटातून स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, आशा पाटील, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, रेखा बागेळी, रेश्मा साळुंखे या सात महिला उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

शिंदे म्हणाले की, निवडणुकीसाठी आघाडी करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी जे उमेदवार दिले आहेत, ते अधिकृत आहेत. आम्ही जाहीर केलेले तेरा उमेदवार आघाडीचेच आहेत. त्यामुळे तेराही उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट आहे. कोणत्याही पक्षातील नेते आणि सदस्यांत नाराजी नाही. जिल्हा परिषदेतील साठही सदस्य आघाडीचे आहेत. अर्ज माघारीची चर्चा सुरू होती, या कारणामुळे काही अर्ज राहिले आहेत. मात्र ज्यांचे अर्ज राहिले आहेत, ते आमच्याबरोबरच आहेत. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

नियोजन समितीसाठी दि. ४ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण गटातील १३ जागांसाठी मतदान होईल. तिन्ही पक्षांना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला महिला गटासाठी सहा मतांची गरज आहे.राष्ट्रवादीला सर्वसाधारण गटासाठी तीन, तर काँग्रेसला एका मताची आवश्यकता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे. पक्षांकडे असलेले मतदान बाहेर जाणार नाही, त्याबाबतची खात्री नेत्यांना आहे. मात्र कुणी कोणाला कसे मतदान करायचे, याबाबतची माहिती सदस्यांना मतदानाला जाण्यापूर्वी सांगितली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.आघाडीचे उमेदवार...आघाडीतील तेरा उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून सतीश पवार, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी, शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, विक्रम सावंत असे सहा, तर महिला गटातून स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, आशा पाटील, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, रेखा बागेळी, रेश्मा साळुंखे या सात महिला उमेदवारांची नावे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केली.सत्यजित देशमुखांचा राजीनामा नाही : कदमजिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला नसल्याचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सांगितले. नियोजन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. काँग्रेसला संख्याबळानुसार आलेल्या जागा वाटपातही डॉ. पतंगराव कदम गटाचे वर्चस्व कायम राहिले. सर्वसाधारण गटातील उमेदवारीवरुन गटनेते देशमुख नाराज होेते, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजीनामा दिला नसल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, काँग्रेसचे विक्रम सावंत उपस्थित होते.