शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

‘नियोजन’च्या तेरा जागा संयुक्त आघाडीच्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:46 IST

सांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत तांत्रिक कारणांमुळे काही अर्ज राहिले.

ठळक मुद्दे विलासराव शिंदे, मोहनराव कदम : गटबाजी नाही; ६० सदस्य भाजप आणि दोन्ही काँग्रेसबरोबरचअर्ज माघारीची चर्चा सुरू होती, या कारणामुळे काही अर्ज राहिले आहेत. आघाडीच्या तेरा उमेदवारांची नावेही जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत तांत्रिक कारणांमुळे काही अर्ज राहिले. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी संयुक्त आघाडीच्याच तेरा जागा असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले. आघाडीच्या तेरा उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली. नेते आणि सदस्यांमध्ये कोणतीही गटबाजी नसून साठही सदस्य आमच्यासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नियोजन समिती निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची लांबणीवर पडलेली बैठक शुक्रवारी पार पडली. निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे. या आघाडीतील तेरा उमेदवारांची नावेही जाहीर केली. सर्वसाधारण गटातून सतीश पवार, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी, शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, विक्रम सावंत असे सहा, तर महिला गटातून स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, आशा पाटील, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, रेखा बागेळी, रेश्मा साळुंखे या सात महिला उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

शिंदे म्हणाले की, निवडणुकीसाठी आघाडी करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी जे उमेदवार दिले आहेत, ते अधिकृत आहेत. आम्ही जाहीर केलेले तेरा उमेदवार आघाडीचेच आहेत. त्यामुळे तेराही उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट आहे. कोणत्याही पक्षातील नेते आणि सदस्यांत नाराजी नाही. जिल्हा परिषदेतील साठही सदस्य आघाडीचे आहेत. अर्ज माघारीची चर्चा सुरू होती, या कारणामुळे काही अर्ज राहिले आहेत. मात्र ज्यांचे अर्ज राहिले आहेत, ते आमच्याबरोबरच आहेत. त्यामुळे गोंधळ होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

नियोजन समितीसाठी दि. ४ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण गटातील १३ जागांसाठी मतदान होईल. तिन्ही पक्षांना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी एकमेकांची मदत घ्यावी लागणार आहे. भाजपला महिला गटासाठी सहा मतांची गरज आहे.राष्ट्रवादीला सर्वसाधारण गटासाठी तीन, तर काँग्रेसला एका मताची आवश्यकता आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली आहे. पक्षांकडे असलेले मतदान बाहेर जाणार नाही, त्याबाबतची खात्री नेत्यांना आहे. मात्र कुणी कोणाला कसे मतदान करायचे, याबाबतची माहिती सदस्यांना मतदानाला जाण्यापूर्वी सांगितली जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले.आघाडीचे उमेदवार...आघाडीतील तेरा उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून सतीश पवार, सुहास बाबर, तम्मणगौडा रवी, शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, विक्रम सावंत असे सहा, तर महिला गटातून स्नेहलता जाधव, सुरेखा जाधव, आशा पाटील, आशाराणी पाटील, जयश्री पाटील, रेखा बागेळी, रेश्मा साळुंखे या सात महिला उमेदवारांची नावे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. कदम आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केली.सत्यजित देशमुखांचा राजीनामा नाही : कदमजिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला नसल्याचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी सांगितले. नियोजन समितीच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली होती. काँग्रेसला संख्याबळानुसार आलेल्या जागा वाटपातही डॉ. पतंगराव कदम गटाचे वर्चस्व कायम राहिले. सर्वसाधारण गटातील उमेदवारीवरुन गटनेते देशमुख नाराज होेते, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राजीनामा दिला नसल्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, काँग्रेसचे विक्रम सावंत उपस्थित होते.