शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाच्या श्रीखंडात सर्वपक्षीय वाटेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या आरक्षित जागांचा बाजार पुन्हा एकदा गरम झाला आहे. भाजपच्या काळात तरी जागांचा बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या आरक्षित जागांचा बाजार पुन्हा एकदा गरम झाला आहे. भाजपच्या काळात तरी जागांचा बाजार होणार नाही, ही अपेक्षा फोल ठरू लागली आहे. या भूखंडाच्या श्रीखंडात केवळ भाजपच नव्हे, तर सर्वपक्षीय वाटेकरी आहेत. त्यामुळे नेमका दोष कुणाला द्यायचा, असा प्रश्न आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कारभाराचीच भाजपकडूनही री ओढली जात असल्याने, आजच्यापेक्षा कालचा पिक्चर बरा होता, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

महापालिकेवर सर्वाधिक काळ काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. या काळात अनेक जागांवरील आरक्षण उठविण्याचा पराक्रम झाला होता. त्यात बीओटीतून काही प्रकल्प उभारल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात जनतेत असंतोषाचे वातावरण तयार झाले. पण २०१४ पासून दोन्ही काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपकडे पाहिले जाऊ लागले. जनतेने महापालिकेची सत्ताही त्यांच्या हाती सोपविली. पण दोन वर्षात पुन्हा आरक्षण रद्द करण्याचे विषय समोर येऊ लागल्याने भाजपच्या आश्वासनावरील भरोसा उठू लागला आहे.

येत्या महासभेत कुपवाड येथील प्राथमिक शाळा व प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविण्याचा विषय अजेंड्यावर आहे. ही जागा जवळपास ७ एकर इतकी आहे. त्यात अडीच एकर जागा मोकळी आहे. तेथील आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्र दिले आहे. कोल्हापूर व माधवनगर रस्त्यावरील जकात नाके व कुपवाड येथील जागा परस्परच लाटण्याचा डाव होता. त्यासाठी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी उपसूचना दिली होती. विश्रामबाग येथील आरक्षणाच्या जागेत तर बडे बडे नेते असल्याची चर्चा आहे. एकूणच सर्वपक्षीय सदस्यांकडून आरक्षणाचा बाजार सुरू झाला आहे.

चौकट

सत्ताधारी नेते गप्प

काही महिन्यांपूर्वी एका आरक्षित जागेपोटी महापालिकेने टीडीआर दिला होता. पहिल्यांदा टीडीआर दिल्याचे भाजपने चांगलेच मार्केटिंग केले. आता मात्र टीडीआरच्या प्रस्तावाचा विचार सत्ताधाऱ्यांकडून का होत नाही? त्यात आरक्षणाच्या जागांवरून सर्वपक्षीय कृती समितीने आवाज उठविला आहे. पण सत्ताधाऱ्यांचे नेते, कोअर कमिटीसह पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे. त्यामुळे या कारभाराला त्यांची मूकसंमती आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.