शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाच्या श्रीखंडात सर्वपक्षीय वाटेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिकेच्या आरक्षित जागांचा बाजार पुन्हा एकदा गरम झाला आहे. भाजपच्या काळात तरी जागांचा बाजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या आरक्षित जागांचा बाजार पुन्हा एकदा गरम झाला आहे. भाजपच्या काळात तरी जागांचा बाजार होणार नाही, ही अपेक्षा फोल ठरू लागली आहे. या भूखंडाच्या श्रीखंडात केवळ भाजपच नव्हे, तर सर्वपक्षीय वाटेकरी आहेत. त्यामुळे नेमका दोष कुणाला द्यायचा, असा प्रश्न आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कारभाराचीच भाजपकडूनही री ओढली जात असल्याने, आजच्यापेक्षा कालचा पिक्चर बरा होता, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे.

महापालिकेवर सर्वाधिक काळ काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. या काळात अनेक जागांवरील आरक्षण उठविण्याचा पराक्रम झाला होता. त्यात बीओटीतून काही प्रकल्प उभारल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराविरोधात जनतेत असंतोषाचे वातावरण तयार झाले. पण २०१४ पासून दोन्ही काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपकडे पाहिले जाऊ लागले. जनतेने महापालिकेची सत्ताही त्यांच्या हाती सोपविली. पण दोन वर्षात पुन्हा आरक्षण रद्द करण्याचे विषय समोर येऊ लागल्याने भाजपच्या आश्वासनावरील भरोसा उठू लागला आहे.

येत्या महासभेत कुपवाड येथील प्राथमिक शाळा व प्ले ग्राऊंडचे आरक्षण उठविण्याचा विषय अजेंड्यावर आहे. ही जागा जवळपास ७ एकर इतकी आहे. त्यात अडीच एकर जागा मोकळी आहे. तेथील आरक्षण उठविण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पत्र दिले आहे. कोल्हापूर व माधवनगर रस्त्यावरील जकात नाके व कुपवाड येथील जागा परस्परच लाटण्याचा डाव होता. त्यासाठी काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी उपसूचना दिली होती. विश्रामबाग येथील आरक्षणाच्या जागेत तर बडे बडे नेते असल्याची चर्चा आहे. एकूणच सर्वपक्षीय सदस्यांकडून आरक्षणाचा बाजार सुरू झाला आहे.

चौकट

सत्ताधारी नेते गप्प

काही महिन्यांपूर्वी एका आरक्षित जागेपोटी महापालिकेने टीडीआर दिला होता. पहिल्यांदा टीडीआर दिल्याचे भाजपने चांगलेच मार्केटिंग केले. आता मात्र टीडीआरच्या प्रस्तावाचा विचार सत्ताधाऱ्यांकडून का होत नाही? त्यात आरक्षणाच्या जागांवरून सर्वपक्षीय कृती समितीने आवाज उठविला आहे. पण सत्ताधाऱ्यांचे नेते, कोअर कमिटीसह पदाधिकाऱ्यांनी मौन पाळले आहे. त्यामुळे या कारभाराला त्यांची मूकसंमती आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.