शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कार्यालयासाठी विमानतळाची जागा?

By admin | Updated: May 11, 2015 23:49 IST

कवलापुरात पाहणी : प्रस्ताव दाखल नाही; अनेक वर्षांपासून जागेचा शोध; प्रयत्नांना यश मिळणार कधी?

सचिन लाड - सांगली -प्रत्येकवर्षी शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करून देणारे सांगलीचे उप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत आहे. अधिकारी येतात आणि दोन वर्षाने बदली होऊन जातात, पण जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. सध्याचे आरटीओ दशरथ वाघुले यांनी जागेचा शोध सुरू ठेवला आहे. मात्र अद्याप त्यांना कोणतीही जागा मिळालेली नाही. कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळाची जागा घेण्याचा विचार सुरू आहे. मात्र ही जागा एमआयडीसीच्या ताब्यात असल्याने ती मिळेल की नाही, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.विमानतळावर शेरीनाल्याचे शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. हे केंद्र करण्यासाठी महापालिकेला जागा मिळत नाही. कवलापुरात लोकवस्तीत जागा घेतली होती; पण ग्रामस्थांनी विरोध केल्याने त्यांना गावाबाहेर विमानतळावरील जागेशिवाय पर्याय नव्हता. जागा एमआयडीसीकडून त्यांनी खरेदी करून केंद्र उभे केले आहे. विमानतळाची ही जागा फार मोठी असून कित्येक वर्षे पडून आहे. विमानतळासाठी दोनवेळा उद्घाटनही झाले आहे. यापूर्वीचे आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांनी आपटा पोलीस चौकीजवळील शाळा क्रमांक आठमध्ये कार्यालय नेण्याचे नक्की केले होते. महापालिकेने त्यांना ही इमारत देण्याचा ठरावही केला होता. परंतु गडसिंग गतवर्षी सेवानिवृत्त झाले आणि या तयार इमारतीचा प्रश्नही बारगळला. जागा खूप लहान आहे. कार्यालयात कामानिमित्त दररोज शेकडो लोक येतात. त्यांची वाहने कोठे पार्किंग करायची?, हा मोठा प्रश्न आहे. यामुळे शाळा क्रमांक आठच्या इमारतीत आरटीओ कार्यालय स्थलांतराच्या विषयाला वाघुले यांनी पूर्णविराम दिला आहे. सध्या ते नवीन जागेच्या शोधात आहेत. विशेषत: सांगली-तासगाव या मार्गावर किमान १५ एकर तरी जागा मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. कवलापुरातील विमानतळावरील जागा घेण्याचा विचार सुरू असला तरी, यासंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. ७० कोटींचा गल्लाराज्य शासनाकडून प्रत्येकवर्षी आरटीओ कार्यालयास महसूल उद्दिष्ट दिले जाते. गतवर्षी सुमारे ७० कोटींचे उद्दिष्ट होते. कार्यालयाकडून हे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. प्रत्येकवर्षी शासनाकडून महसूल उद्दिष्टामध्ये पाच-दहा कोटींची वाढ केली जात आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची कमाई करून देणारे हे कार्यालय मात्र भाड्याच्या जागेत, घाणीच्या साम्राज्यात, तसेच शहरातून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. हे कार्यालय हक्काच्या स्वत:च्या जागेत नेण्यासाठी शासनाकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत. अधिकारी जागेचा शोध घेत असले तरी, त्यांना स्थानिक कोणतीही माहिती नसते. त्यामुळे अडचणी येतात.