शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

कृषी अधिकारी निलंबित

By admin | Updated: May 21, 2017 01:16 IST

चापकटर घोटाळा प्रकरण : दोघांवर फौजदारी कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा परिषदेत १७ लाख ८६ हजारांच्या चापकटर घोटाळाप्रकरणी कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले व जिल्हा कृषी अधिकारी अनिल कदम यांना शनिवारी कृषी विभागाच्या सचिवांनी निलंबित केले. त्यांच्यावर फौजदारीची शिफारसही केली आहे. इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.जिल्हा परिषद स्वीय निधीतून कृषी विभागाने २०१५-१६ मध्ये ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना चापकटर पुरवठा योजना राबवली. जिल्हा परिषदेचे ४० लाख व लाभार्थी हिश्श्याचे ४० लाख असे ८० लाख रुपये खर्ची पडले. या खरेदीत १७ लाख ८६ हजारांचे घोटाळा प्रकरण गाजले आहे. १६ हजार ३०० रुपये कमी दराची निविदा असताना ती रद्द करून २१ हजार रुपये दराने चापकटर खरेदी केले होते. पहिल्या निविदेची प्रक्रिया सुरू असताना, बेकायदेशीरपणे दुसरी, तिसरी निविदा काढून कृषी विभाग आणि खरेदी समितीने कृषी समिती आणि जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेला अंधारात ठेवून घोटाळा केल्याचा आरोप तत्कालीन सदस्य रणधीर नाईक यांनी केला होता. नाईक यांनी पुणे विभागीय आयुक्त, ग्रामविकासमंत्री, कृषीमंत्री यांच्याकडेही तक्रार केली होती. या चौकशीसाठी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. जादा दराने चापकटर खरेदी केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला. याप्रकरणी ग्रामविकास विभागाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांना आठवड्यापूर्वी निलंबित केले आहे, तर साहित्य खरेदी समितीचे सचिव, कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले व जिल्हा कृषी अधिकारी अनिल कदम यांना कृषी सचिवांनी शनिवारी निलंबित केले. दरम्यान, भोसले रजेवर गेले असून, चापकटर खरेदीप्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे. वित्त अधिकाऱ्यांसह आठजणांची चौकशीया घोटाळ्यात तत्कालीन मुख्य वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे, लेखाधिकारी रेणुका पाटील, सहाय्यक लेखाधिकारी रोहन शेटे, कृषी विभागाकडील सहाय्यक लेखाधिकारी एस. एम. जाधव, कनिष्ठ लेखाधिकारी एन. जी. पट्टणशेट्टी, वरिष्ठ सहाय्यक सौ. एस. डी. कुरकुट्टे, तत्कालीन कनिष्ठ लेखाधिकारी ए. बी. लोंढे, सी. जे. जंगम यांच्यावर पहिल्या चौकशीमध्ये ठपका ठेवण्यात आला होता. दुसऱ्या चौकशीत त्यांना वगळले आहे, हे गंभीर आहे. त्यामुळे सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर राज्य शासन कारवाई करणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. आमदार नाईक, जगतापांचा रेटाआमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप यांनी कृषी विभागाकडील चौकशीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानुसार कृषी राज्यमंत्री खोत यांनी अधिकाऱ्यांवर शनिवारी कारवाई केली. याचा अधिकृत आदेश सोमवारी जिल्हा परिषदेला मिळणार आहे. यामुळे कृषी विभागाकडे एकच अधिकारी शिल्लक राहिला आहे.