शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

By admin | Updated: May 9, 2017 23:26 IST

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण बाजाचं जगण देण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्र करत आहेत. जिल्ह्यात सध्या ४८ कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत. तर सुमारे २५ पर्यटन केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. पर्यटनाबरोबरचं पर्यावरणाचा वारसा जपण्यासाठी ही कृषी पर्यटन केंद्र आदर्शवत वाटचाल करत आहेत. एकेका पर्यटन केंद्रात सरासरी दीड ते दोन हजार वृक्षांची लागवड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाळी ही केंद्रे वाळवंटातील मरूद्यान ठरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. सातारा तालुक्यातील बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्र हे जिल्ह्यातील पहिले केंद्र. कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नेमके काय हे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह बाहेरूनही लोकांचा राबता आता केंद्रावर राहिला. स्थानिक लोकांना रोजगार देण्याबरोबरचं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न जिल्ह्याने अभिमानाने पुढे नेला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ४८ कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि निसर्गाचा समतोल राखला गेला. त्याबरोबरच वृक्षारोपणाचा नवा पायंडाही पडला. कृषी पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांना शेतीचा बाज अनुभवायचा असेल तर केंद्राच्या परिसरात हिरवळ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटन केंद्र चालकांनी आंबा, नारळ, चिक्कु, लिंबु, सागवान, कडुनिंब, बाभळ, फणस, केळ, सिताफळ, अ‍ॅपल बोर, गुलाब, झेंडु यांच्यासह विविध मसाल्यांची आणि काही परदेशी वाणाच्या झाडांची लागवड केली. पर्यटकांना झाडांची माहिती व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. पण या उद्देशाच्या निमित्ताने एकेका कृषी पर्यटन केंद्रात दीड ते दोन हजार झाडांची लागवड झाली.जिल्ह्यात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या कृषी पर्यटन केंद्रांमध्ये आता पर्यटकांचाही चांगला राबता आहे. काही पर्यटन केंद्रांनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रोपटे भेट देण्याचा नवा संकल्प केला आहे. यानिमित्ताने केंद्राची आठवण राहते आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या कडीत त्यांना गुंफता येते, असे पर्यटन केंद्र चालकांचे मत आहे.जिल्ह्यातील या पर्यटन केंद्रांमुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्षात उतरला असल्याचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून व्यक्त होत आहे. आजपासून पर्यटन विशेषांकवाचकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्ती वर्धापन दिनानिमित्त दि. १० मे पासून पर्यटन विशेषांक प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, पर्यटन क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधी, जागतिक स्तरावर मिळालेले कोंदण आदी सर्वंकष माहितीचा खजीना या विशेषांकाद्वारे वाचकांच्या हाती पडणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कॅक्टस गार्डनवनस्पती शास्त्रांत अत्यंत महत्वाचे मानले गेलेले मात्र, माणसांना त्रासदायक असणारे कॅक्टसचे झाड आता फार कमी ठिकाणी पहायला मिळते. बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रात दुर्मिळ अशा ८२ प्रकारच्या कॅकटसचे स्वतंत्र गार्डन केले आहे. दुर्मिळ वनस्पती एकत्र पहायला मिळाव्यात या उद्देशाने या गार्डनची आखणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग बोरगाव येथे केला आहे.