शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

By admin | Updated: May 9, 2017 23:26 IST

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण बाजाचं जगण देण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्र करत आहेत. जिल्ह्यात सध्या ४८ कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत. तर सुमारे २५ पर्यटन केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. पर्यटनाबरोबरचं पर्यावरणाचा वारसा जपण्यासाठी ही कृषी पर्यटन केंद्र आदर्शवत वाटचाल करत आहेत. एकेका पर्यटन केंद्रात सरासरी दीड ते दोन हजार वृक्षांची लागवड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाळी ही केंद्रे वाळवंटातील मरूद्यान ठरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. सातारा तालुक्यातील बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्र हे जिल्ह्यातील पहिले केंद्र. कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नेमके काय हे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह बाहेरूनही लोकांचा राबता आता केंद्रावर राहिला. स्थानिक लोकांना रोजगार देण्याबरोबरचं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न जिल्ह्याने अभिमानाने पुढे नेला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ४८ कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि निसर्गाचा समतोल राखला गेला. त्याबरोबरच वृक्षारोपणाचा नवा पायंडाही पडला. कृषी पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांना शेतीचा बाज अनुभवायचा असेल तर केंद्राच्या परिसरात हिरवळ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटन केंद्र चालकांनी आंबा, नारळ, चिक्कु, लिंबु, सागवान, कडुनिंब, बाभळ, फणस, केळ, सिताफळ, अ‍ॅपल बोर, गुलाब, झेंडु यांच्यासह विविध मसाल्यांची आणि काही परदेशी वाणाच्या झाडांची लागवड केली. पर्यटकांना झाडांची माहिती व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. पण या उद्देशाच्या निमित्ताने एकेका कृषी पर्यटन केंद्रात दीड ते दोन हजार झाडांची लागवड झाली.जिल्ह्यात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या कृषी पर्यटन केंद्रांमध्ये आता पर्यटकांचाही चांगला राबता आहे. काही पर्यटन केंद्रांनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रोपटे भेट देण्याचा नवा संकल्प केला आहे. यानिमित्ताने केंद्राची आठवण राहते आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या कडीत त्यांना गुंफता येते, असे पर्यटन केंद्र चालकांचे मत आहे.जिल्ह्यातील या पर्यटन केंद्रांमुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्षात उतरला असल्याचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून व्यक्त होत आहे. आजपासून पर्यटन विशेषांकवाचकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्ती वर्धापन दिनानिमित्त दि. १० मे पासून पर्यटन विशेषांक प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, पर्यटन क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधी, जागतिक स्तरावर मिळालेले कोंदण आदी सर्वंकष माहितीचा खजीना या विशेषांकाद्वारे वाचकांच्या हाती पडणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कॅक्टस गार्डनवनस्पती शास्त्रांत अत्यंत महत्वाचे मानले गेलेले मात्र, माणसांना त्रासदायक असणारे कॅक्टसचे झाड आता फार कमी ठिकाणी पहायला मिळते. बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रात दुर्मिळ अशा ८२ प्रकारच्या कॅकटसचे स्वतंत्र गार्डन केले आहे. दुर्मिळ वनस्पती एकत्र पहायला मिळाव्यात या उद्देशाने या गार्डनची आखणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग बोरगाव येथे केला आहे.