शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

By admin | Updated: May 9, 2017 23:26 IST

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण बाजाचं जगण देण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्र करत आहेत. जिल्ह्यात सध्या ४८ कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत. तर सुमारे २५ पर्यटन केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. पर्यटनाबरोबरचं पर्यावरणाचा वारसा जपण्यासाठी ही कृषी पर्यटन केंद्र आदर्शवत वाटचाल करत आहेत. एकेका पर्यटन केंद्रात सरासरी दीड ते दोन हजार वृक्षांची लागवड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाळी ही केंद्रे वाळवंटातील मरूद्यान ठरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. सातारा तालुक्यातील बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्र हे जिल्ह्यातील पहिले केंद्र. कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नेमके काय हे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह बाहेरूनही लोकांचा राबता आता केंद्रावर राहिला. स्थानिक लोकांना रोजगार देण्याबरोबरचं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न जिल्ह्याने अभिमानाने पुढे नेला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ४८ कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि निसर्गाचा समतोल राखला गेला. त्याबरोबरच वृक्षारोपणाचा नवा पायंडाही पडला. कृषी पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांना शेतीचा बाज अनुभवायचा असेल तर केंद्राच्या परिसरात हिरवळ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटन केंद्र चालकांनी आंबा, नारळ, चिक्कु, लिंबु, सागवान, कडुनिंब, बाभळ, फणस, केळ, सिताफळ, अ‍ॅपल बोर, गुलाब, झेंडु यांच्यासह विविध मसाल्यांची आणि काही परदेशी वाणाच्या झाडांची लागवड केली. पर्यटकांना झाडांची माहिती व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. पण या उद्देशाच्या निमित्ताने एकेका कृषी पर्यटन केंद्रात दीड ते दोन हजार झाडांची लागवड झाली.जिल्ह्यात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या कृषी पर्यटन केंद्रांमध्ये आता पर्यटकांचाही चांगला राबता आहे. काही पर्यटन केंद्रांनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रोपटे भेट देण्याचा नवा संकल्प केला आहे. यानिमित्ताने केंद्राची आठवण राहते आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या कडीत त्यांना गुंफता येते, असे पर्यटन केंद्र चालकांचे मत आहे.जिल्ह्यातील या पर्यटन केंद्रांमुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्षात उतरला असल्याचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून व्यक्त होत आहे. आजपासून पर्यटन विशेषांकवाचकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्ती वर्धापन दिनानिमित्त दि. १० मे पासून पर्यटन विशेषांक प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, पर्यटन क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधी, जागतिक स्तरावर मिळालेले कोंदण आदी सर्वंकष माहितीचा खजीना या विशेषांकाद्वारे वाचकांच्या हाती पडणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कॅक्टस गार्डनवनस्पती शास्त्रांत अत्यंत महत्वाचे मानले गेलेले मात्र, माणसांना त्रासदायक असणारे कॅक्टसचे झाड आता फार कमी ठिकाणी पहायला मिळते. बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रात दुर्मिळ अशा ८२ प्रकारच्या कॅकटसचे स्वतंत्र गार्डन केले आहे. दुर्मिळ वनस्पती एकत्र पहायला मिळाव्यात या उद्देशाने या गार्डनची आखणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग बोरगाव येथे केला आहे.