शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नाराजीच्या विस्तवाने राष्ट्रवादीचे घर पेटले

By admin | Updated: August 11, 2015 00:38 IST

सांगली बाजार समिती : काँग्रेसचे बाहुबल सिद्ध

अंजर अथणीकर-सांगली पक्षांतर्गत संघर्षाच्या विस्तवाने राष्ट्रवादीच्या घराला आग लागली आणि भरल्या बाजारात जयंतरावांच्या सैन्याला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी आणि नेत्यांमधील अति आत्मविश्वास या गोष्टींचा अचूक फायदा घेत काँग्रेसने बाजार समितीमध्ये परिवर्तनाचा झेंडा रोवला. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात कार्यक्षेत्र असणारी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही तशी राज्यातील महत्त्वाची संस्था आहे. वार्षिक सुमारे तेराशे कोटीची उलाढाल असणारी व सध्या तीस कोटीहून अधिक ठेव असणारी ही संस्था आपल्या ताब्यात असावी, यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील यशानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या निवडणुकीतही तोच फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतला. भाजप, राष्ट्रवादी व मदन पाटील गट एकत्रित आला, मात्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना सामील करून घेण्यात त्यांना अपयश आले. मध्यवर्ती बँकेत डावलल्याने त्यांची नाराजी होती. तिकीट वाटपातही आजी, माजी संचालकांना पूर्णपणे डावलल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. कवठेमहांकाळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष भानुदास पाटील, माजी सभापती एम. के. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले, बाळू पाटील, आप्पासाहेब पाटील, शिरढोणचे माजी सरपंच शिवाजी कदम, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती जालिंदर देसाई, शिवाजी कदम, जतमधील धनगर समाजाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती आकाराम मासाळ असे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारीच्या प्रश्नावरून नाराज होते. या नाराज मंडळींना एकत्रित आणण्यात काँग्रेसमधील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यातच कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. इतकी नाराजी वाढत असतानाही जयंत पाटील यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. आर. आर. पाटील यांचा राष्ट्रवादीमधील गटही नाराज होता. निवडणुकीच्या आधी पाच दिवस या नाराज गटाने मेळावा घेऊन उघडपणे काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. नेत्यांकडून ही नाराजी दुर्लक्षित झाल्याने नाराजीत भर पडली. त्यांनी मोट बांधून काँग्रेस आघाडीचा प्रचार केला. पतंगरावांनी नाराजांना सोबत घेऊनच काम करण्याचे आश्वासन दिले. त्यातच शेवटच्या टप्प्यात जयंतरावांनी निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. भाजप नेत्यांनीही म्हणावा तितका जोर लावला नाही. सोसायटी, ग्रामपंचायती संख्येने अधिक ताब्यात असूनही विस्कळीत प्रचारामुळे काँग्रेस आघाडीचा विजय सुलभ झाला. मदन पाटील यांचा गड शाबूतया निवडणुकीत मदन पाटील यांचा गट शाबूत असल्याचे दिसून आले आहे. मदन पाटील हे स्वत: या निवडणुकीत सहज निवडून आले. यासाठी काँग्रेस आघाडीनेही समझोत्याचे राजकारण केले. शिवाय सहकारी गटातून राष्ट्रवादी आघाडीतून निवडून आलेले वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील हेही मदन पाटील गटाचेच मानले जातात. व्यापारी गटातून निवडून आलेले शीतल पाटील, मुुजीर जांभळीकर हे मदन पाटील यांनाच मानणारे आहेत. मात्र त्यांनी सध्या तरी अपक्ष राहण्याची भूमिका घेतली आहे.