शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा कहर व वाढत्या संख्येमुळे बाधितांची संख्या ५० हजारांजवळ येऊन पोहोचली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा कहर व वाढत्या संख्येमुळे बाधितांची संख्या ५० हजारांजवळ येऊन पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याने दिलासा मिळत असला तरी प्रशासनातर्फे उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. एकदा कोरोना हाेऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण नगण्य असून आतापर्यंत सरासरी तीन टक्केच रुग्णांना कोरोनाची केवळ लक्षणे आढळल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिले तीन महिने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. त्याचा विस्फोट होत संपूर्ण जिल्हा कोरोेनाच्या विळख्यात सापडला होता. अगदी रुग्णांना उपचार मिळण्यासही अडचणी येत होत्या.

प्रशासनाच्या नियोजनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात दिवसाला सरासरी १० ते १३ नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यातही अगोदर कोरोना झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजारांवर बाधित आढळले आहेत.

चौकट

जिल्ह्यातील एकूण बाधित----------

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण ------------

उपचार सुरू असलेले रुग्ण------

आतापर्यंतचे कोरोनाबळी -------------

चौकट

तीन महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडी प्रभावी?

कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये विषाणूला प्रतिकार करणारी ‘ॲन्टीबॉडी’ तयार होते. आतापर्यंतच्या जिल्ह्यातील रुग्णांच्या अभ्यासानुसार किमान तीन महिन्यांपर्यंत त्या कार्यरत असल्याचे निदान झाले आहे. यावर आरोग्य यंत्रणेच्यावतीने नेहमीच अभ्यास सुरू आहे.

चौकट

खबरदारी हाच उपाय

१) राज्यातील काही भागात सध्या पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष न करता त्यापासून बचावासाठी उपाययोजनाच कोरोनापासून बचाव करू शकतात.

२) सध्या कोरोनाची लस आली असलीतरी अजूनही आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सनाच लसीकरण सुरू आहे. सर्वसामान्यांना अद्याप लस मिळत नसल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

३) मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि वारंवार हात धुण्यासह वैयक्तिक स्वच्छताच बचावाचे आताचे तरी साधन आहे.

कोट

जिल्ह्यात सध्या बाधितांचे प्रमाण कमी असल्याने दिलासा असलातरी प्रत्येकाने अजूनही कोरोना गेला नसल्याने काळजी घ्यावी. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचेही प्रमाण जिल्ह्यात खूपच कमी आहे.

डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक