शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा कहर व वाढत्या संख्येमुळे बाधितांची संख्या ५० हजारांजवळ येऊन पोहोचली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा कहर व वाढत्या संख्येमुळे बाधितांची संख्या ५० हजारांजवळ येऊन पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याने दिलासा मिळत असला तरी प्रशासनातर्फे उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. एकदा कोरोना हाेऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण नगण्य असून आतापर्यंत सरासरी तीन टक्केच रुग्णांना कोरोनाची केवळ लक्षणे आढळल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिले तीन महिने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. त्याचा विस्फोट होत संपूर्ण जिल्हा कोरोेनाच्या विळख्यात सापडला होता. अगदी रुग्णांना उपचार मिळण्यासही अडचणी येत होत्या.

प्रशासनाच्या नियोजनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात दिवसाला सरासरी १० ते १३ नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यातही अगोदर कोरोना झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजारांवर बाधित आढळले आहेत.

चौकट

जिल्ह्यातील एकूण बाधित----------

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण ------------

उपचार सुरू असलेले रुग्ण------

आतापर्यंतचे कोरोनाबळी -------------

चौकट

तीन महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडी प्रभावी?

कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये विषाणूला प्रतिकार करणारी ‘ॲन्टीबॉडी’ तयार होते. आतापर्यंतच्या जिल्ह्यातील रुग्णांच्या अभ्यासानुसार किमान तीन महिन्यांपर्यंत त्या कार्यरत असल्याचे निदान झाले आहे. यावर आरोग्य यंत्रणेच्यावतीने नेहमीच अभ्यास सुरू आहे.

चौकट

खबरदारी हाच उपाय

१) राज्यातील काही भागात सध्या पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष न करता त्यापासून बचावासाठी उपाययोजनाच कोरोनापासून बचाव करू शकतात.

२) सध्या कोरोनाची लस आली असलीतरी अजूनही आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सनाच लसीकरण सुरू आहे. सर्वसामान्यांना अद्याप लस मिळत नसल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

३) मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि वारंवार हात धुण्यासह वैयक्तिक स्वच्छताच बचावाचे आताचे तरी साधन आहे.

कोट

जिल्ह्यात सध्या बाधितांचे प्रमाण कमी असल्याने दिलासा असलातरी प्रत्येकाने अजूनही कोरोना गेला नसल्याने काळजी घ्यावी. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचेही प्रमाण जिल्ह्यात खूपच कमी आहे.

डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक