शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘तासगाव’साठी पुन्हा एक वर्षाचीच निविदा

By admin | Updated: August 3, 2014 01:50 IST

गळीत हंगामाची शक्यता धूसर : राज्य बॅँकेच्या ताठर भूमिकेमुळे साखर कारखान्याचे भवितव्य अधांतरितच

भिलवडी : तासगाव-पलूस तालुका सहकारी साखर कारखान्याप्रश्नी राज्य सहकारी बॅँकेच्या ताठर भूमिकेपुढे गृहमंत्री आर. आर. पाटील व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना हतबल होण्याची वेळ आली आहे. कारखाना दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर देण्यासाठी अवसायक मंडळाच्या ताब्यात द्या, अशा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राज्य बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दुसऱ्यांदा एक वर्षासाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालवावयास देण्यासाठी टेंडर नोटीस काढून सरकारपेक्षाही बॅँक मोठी असल्याचे दुसऱ्यांदा सिद्ध केले आहे. गतवर्षाप्रमाणे कारखाना याहीवर्षी सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत तासगाव कारखाना अवसायकांच्या ताब्यात देण्याबाबत राज्य बँकेने अंतिम निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. तासगाव कारखान्यावर असलेल्या राज्य बँकेच्या कर्जाच्या परतफेडीची हमी राज्य सरकार घेण्यास तयार आहे, असेही सांगितले होते. मात्र राज्य बँकेने बैठकीत ठरलेले निर्णय धुडकावून लावत नेहमीप्रमाणे आपल्या ताठर भूमिकेचे दुसऱ्यांदा प्रदर्शन केले. कारखाना अवसायकाच्या ताब्यात देण्याऐवजी तो एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे टेंडर नोटीस आज काही दैनिकांमधून प्रसिद्धीस दिले आहे. तासगाव कारखान्याच्या विक्री व्यवहाराबाबत अवसायकांनी डी. आर. ए. टी. (ऋण वसुली व अपिलीय अधिकारण) न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. तसेच गणपती संघाशी झालेला विक्री व्यवहार रद्द करणेबाबत उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल आहेत. हे कारण दाखवून कारखाना २०१४-१५ या गळीत हंगामाकरिता एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडे कराराने देण्याबाबत निविदा २५ आॅगस्टपर्यंत सादर करण्याची नोटीस काढली. एका वर्षासाठी अडीच कोटी रुपये स्थिर भाडे व प्रति मे. टन शंभर रुपयेप्रमाणे गाळपावर भाडे आकारण्यात येणार आहे. सोनहिरा साखर कारखान्याने सात वर्षाच्या कालावधित राज्य बँकेचे २६ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याची तयारी दाखवून भाडेपट्ट्यासाठी ३१ आॅगस्ट रोजी टेंडर निविदा भरली. तसेच क्रांती सह. साखर कारखान्यानेही अशीच निविदा भरली होती. अशा स्थितीत कारखाना सुरू करायचा झाल्यास मशिनरीच्या नूतनीकरणासाठी किमान सात कोटी खर्च अपेक्षित आहे. अडीच लाख टन गाळप ग्राह्य धरल्यास स्थिर भाड्यासह किमान पाच कोटी भाडेपट्टा होईल. बारा कोटी गुंतवून एक वर्षात भाडेपट्ट्यावर कारखाना चालवणे हे न परवडणारे गणित आहे. परिणामी गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कारखाना सुरू होणार नाही. याप्रश्नी गृहमंत्री व वनमंत्र्यांनी निर्णायक भूमिकेस तासगाव व पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर जावे लागेल. (वार्ताहर)