शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाभला स्थानिक डॉक्टर

By admin | Updated: August 17, 2014 22:31 IST

कास परिसर आनंदला : देवकलच्या सचिन अहिरेने दुर्गम भागाला मिळवून दिला सन्मान

स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाभला स्थानिक डॉक्टरकास परिसर आनंदला : देवकलच्या सचिन अहिरेने दुर्गम भागाला मिळवून दिला सन्मानबामणोली : निसर्गाची मुक्त उधळण असूनही अत्यंत खडतर जीवन जगणाऱ्या कास व परिसरातील गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या परिसरातील देवकल गावचा युवक परिस्थितीशी झुंजत डॉक्टर बनला आहे. गरिबीवर मात करणाऱ्या या युवकाने स्थानिकांच्या हालअपेष्टा कमी करण्याचा विडा उचलला आहे. देवकल (ता. सातारा) येथील सचिन श्रीरंग अहिरे हे या जिद्दी युवकाचे नाव. पेटेश्वर हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन सचिनने सातारला स्थायिक होऊन मोठ्या कष्टाने पुढील शिक्षण घेतले. कास पठार परिसरातील तो पहिला स्थानिक डॉक्टर ठरला आहे.रंगबिरंगी पुष्पसृष्टीने जगाला भुरळ घालणाऱ्या आणि नैसर्गिक वारसास्थळ ठरलेल्या कास पठार परिसरातील स्थानिक नागरिक मात्र अत्यंत कष्टाचे जीवन जगत आहेत. काससह अनेक गावांमध्ये महिना-महिना वीज गायब असते. एकदा सुरू झालेला पाऊस सलग दोन-तीन महिने कोसळत असतो. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. वाहतूक, वीज, शेती, शिक्षण, आरोग्य या सर्वच पातळ्यांवर समस्याच समस्या आहेत. पावसाळ्यात त्या गंभीर रूप धारण करतात. घाटाईला जाणारी एसटी चोरटाक्यातूनच रस्ता खचल्याने माघारी वळते. धुके, थंडी व मुसळधार पावसाने गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावून गोठे ओस पडले होते. तसेच एका शेतकऱ्याचाही थंडीने गारठून मृत्यू झाला होता. आजही तीच परिस्थिती कायम आहे. अतिवृष्टी आणि जंगली जनावरांमुळे शेतीचे नुकसान होते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ शेती सोडून अन्य उद्योगधंद्यांसाठी सातारा, पुणे व मुंबईला स्थलांतरित होतात. या परिस्थितीमुळे गावात फक्त वयोवृद्ध शेतकरी, शिक्षक व विद्यार्थीच शिल्लक राहिले आहेत. रातराणीच्या फुलांप्रमाणे येथील गावे एप्रिल-मे महिन्यात माणसांच्या गर्दीने फुलतात. गावोगावच्या यात्रा या काळात साजऱ्या होतात.या भूमिपुत्राचा जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले यांच्या हस्ते पेटेश्वर हायस्कूलमध्ये नुकताच सत्कार करण्यात आला. प्रभो शिवाजीराजे प्रतिष्ठानमार्फत झालेल्या या कार्यक्रमात जादूगार गोरखनाथ जाधव, तुषार शेडगे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पेनवाटप, गरीब मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे शिवाजी कदम, तानाजी शिंदे, प्रदीप माने, महादेव मोरे, रामचंद्र मोरे, प्रकाश बादापुरे, पेट्रीचे सरपंच शिवाजी माने, माजी सरपंच लक्ष्मण माने, अंकुशराव मोरे, शंकरराव जांभळे, लक्ष्मण गोगावले, सोमनाथ जाधव, अरुण शेडगे, महादेव अहिरे, सखाराम शिंदे, केंद्रप्रमुख गौतम माने, पेटेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक क्षीरसागर व शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रतिकूल परिस्थितीत मिळविले यशया परिसरात वयोवृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि गरोदर स्त्रियांना आजही डोलीतून मुख्य रस्त्यावर आणावे लागते. शैक्षणिकदृष्ट्या हा भाग मागासलेला असून, पेटेश्वरनगर येथे दहावीपर्यंत शिक्षण देणारी एकमेव शाळा आहे. अकरावीनंतरचे शिक्षण सातारा किंवा मुंबईला जाऊनच करावे लागते. या पार्श्वभूमीवर सचिन अहिरे याने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून गावाला पहिला डॉक्टर दिला आहे.