शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा पराभवानंतर काँग्रेसचे नेते सरसावले

By admin | Updated: May 19, 2014 00:26 IST

सांगली विधानसभा : मदन पाटील यांची तयारी सुरू सांगली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे नेते कोमात गेले असताना, सांगली विधानसभा मतदार संघात

सांगली विधानसभा : मदन पाटील यांची तयारी सुरू सांगली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे नेते कोमात गेले असताना, सांगली विधानसभा मतदार संघात मात्र निकालाच्या दुसर्‍यादिवशी वेगळेच चित्र पहायला मिळाले. काँग्रेसचे नेते, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत बैठक घेऊन नव्याने कामाला सुरुवात केली. तीन महिन्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला पाटील यांनी आतापासून सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात प्रथमच भाजपने घवघवीत यश मिळविले. सर्वच विधानसभा मतदार संघात भाजपला मताधिक्य मिळाल्याने, काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक नेते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. या धक्क्यातून काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळी अजूनही सावरलेली दिसत नाहीत. पण त्याला अपवाद ठरले ते मदन पाटील! लोकसभेच्या निकालानंतर दुसर्‍यादिवशीच त्यांनी महापालिकेत तळ ठोकला. आचारसंहितेपूर्वी सत्ताधार्‍यांनी तब्बल ७० कोटीची कामे हाती घेतली होती. त्यांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या होत्या. पण आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना मुहूर्त लागू शकला नाही. त्यात रस्ते डांबरीकरण, खडीकरण, चरी बुजविण्याची सर्वाधिक कामे असल्याने ती पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रस्त्याची कामे होणार आहेत. त्यानंतर डांबराचे प्रकल्प बंद होतात. डांबरच उपलब्ध होत नसल्याने रस्त्याची कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनासमोर अवघे १५ दिवसच शिल्लक आहेत. पावसाळा संपण्यापूर्वीच विधानसभेचीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचा निधी असूनही कामे झाली नाहीत, तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच मदन पाटील यांनी लोकसभेचा पराभव जिव्हारी लागू न देता नव्याने फेरमांडणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या प्रशासनाचा मदन पाटील यांना दांडगा अनुभव आहे. नेत्यांचा दबाव असेल तरच प्रशासन हलते, अन्यथा नेहमीच कोमात गेलेले असते. त्यामुळे आतापासूनच प्रशासनाला जागे ठेवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी कामे रखडत ठेवण्यात पटाईत असलेल्या महापालिकेतील काही अधिकार्‍यांची भर बैठकीतही कानउघाडणी केली. कोणतीही कारणे न देता खड्डे बुजवा, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही, असा दमही त्यांनी भरला आहे. आता पाटील यांच्या दमबाजीचा प्रशासनावर काही परिणाम होतो का? हे लवकरच कळेल. (प्रतिनिधी)