शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

लोकसभा पराभवानंतर काँग्रेसचे नेते सरसावले

By admin | Updated: May 19, 2014 00:26 IST

सांगली विधानसभा : मदन पाटील यांची तयारी सुरू सांगली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे नेते कोमात गेले असताना, सांगली विधानसभा मतदार संघात

सांगली विधानसभा : मदन पाटील यांची तयारी सुरू सांगली : लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचे नेते कोमात गेले असताना, सांगली विधानसभा मतदार संघात मात्र निकालाच्या दुसर्‍यादिवशी वेगळेच चित्र पहायला मिळाले. काँग्रेसचे नेते, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत बैठक घेऊन नव्याने कामाला सुरुवात केली. तीन महिन्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला पाटील यांनी आतापासून सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात प्रथमच भाजपने घवघवीत यश मिळविले. सर्वच विधानसभा मतदार संघात भाजपला मताधिक्य मिळाल्याने, काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर अनेक नेते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. या धक्क्यातून काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळी अजूनही सावरलेली दिसत नाहीत. पण त्याला अपवाद ठरले ते मदन पाटील! लोकसभेच्या निकालानंतर दुसर्‍यादिवशीच त्यांनी महापालिकेत तळ ठोकला. आचारसंहितेपूर्वी सत्ताधार्‍यांनी तब्बल ७० कोटीची कामे हाती घेतली होती. त्यांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या होत्या. पण आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना मुहूर्त लागू शकला नाही. त्यात रस्ते डांबरीकरण, खडीकरण, चरी बुजविण्याची सर्वाधिक कामे असल्याने ती पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रस्त्याची कामे होणार आहेत. त्यानंतर डांबराचे प्रकल्प बंद होतात. डांबरच उपलब्ध होत नसल्याने रस्त्याची कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनासमोर अवघे १५ दिवसच शिल्लक आहेत. पावसाळा संपण्यापूर्वीच विधानसभेचीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. कोट्यवधीचा निधी असूनही कामे झाली नाहीत, तर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळेच मदन पाटील यांनी लोकसभेचा पराभव जिव्हारी लागू न देता नव्याने फेरमांडणी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या प्रशासनाचा मदन पाटील यांना दांडगा अनुभव आहे. नेत्यांचा दबाव असेल तरच प्रशासन हलते, अन्यथा नेहमीच कोमात गेलेले असते. त्यामुळे आतापासूनच प्रशासनाला जागे ठेवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी कामे रखडत ठेवण्यात पटाईत असलेल्या महापालिकेतील काही अधिकार्‍यांची भर बैठकीतही कानउघाडणी केली. कोणतीही कारणे न देता खड्डे बुजवा, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही, असा दमही त्यांनी भरला आहे. आता पाटील यांच्या दमबाजीचा प्रशासनावर काही परिणाम होतो का? हे लवकरच कळेल. (प्रतिनिधी)