शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारावर प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:31 IST

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. माघारी अर्ज आणि निवडणूक चिन्ह वाटपानंतर गावा-गावात प्रचाराची रंगत ...

सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. माघारी अर्ज आणि निवडणूक चिन्ह वाटपानंतर गावा-गावात प्रचाराची रंगत वाढत आहे. मात्र, गावपातळीवर सुरू असलेल्या या प्रचारावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. याबाबत पथकाची नियुक्ती करण्यात आली असून, आचारसंहितेच्या अंमलबजावणीबरोबरच कायदा व सुव्यवस्थेवरही महसूलसह पोलीस पथकाचे लक्ष असणार आहे.

जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यातील ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४१ ठिकाणी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर सोमवार, दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे.

सध्या गावपातळीवरील प्रचार सुरू झाला असला तरी यंदा कोरोनाविषयक नियमांसह आचारसंहितेची अंमलबजावणी आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी तालुकापातळीवर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावनिहाय तयार पथकाकडून प्रचारावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याबाबत कोणतीही तक्रार असल्याने तहसील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.