शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

सांगलीच्या सन्मती मंचचा व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा जागर--महावीर जयंती विशेष...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:14 IST

सांगली : समाजात अनेक संघटना प्रबोधन, जनजागृतीचे काम करीत असतात. सन्मती संस्कार मंच ही जैन समाजातील अशीच एक संघटना. ही संघटना व्यसनमुक्ती, शाकाहार, स्वच्छता याचबरोबर धर्मसंस्काराचेही काम करते.

ठळक मुद्दे विविध उपक्रम : धर्मसंस्काराला सामाजिक जाणिवेची जोड; व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षणासाठीही कार्यकर्त्यांनी राबविल्या मोहिमा

सांगली : समाजात अनेक संघटना प्रबोधन, जनजागृतीचे काम करीत असतात. सन्मती संस्कार मंच ही जैन समाजातील अशीच एक संघटना. ही संघटना व्यसनमुक्ती, शाकाहार, स्वच्छता याचबरोबर धर्मसंस्काराचेही काम करते. बारा वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आज वटवृक्ष बनले असून महाराष्ट्र, कर्नाटकातील हजारो लोक या मंचाशी जोडले गेले आहेत.

वीर सेवा दलाचे संस्थापक वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या सान्निध्यात राहिलेल्या व त्यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सुरेश चौगले यांनी २२ डिसेंबर २००५ रोजी सन्मती संस्कार मंचाची स्थापना केली. जैन समाजातील नव्या पिढीला धर्मसंस्काराचे धडे देण्याबरोबरच त्यांनी सामाजिक उपक्रमांचीही जोड दिली. संस्थापक सुरेश चौगले, अध्यक्ष विजय भोकरे यांनी सन्मती संस्कार मंचाची पताका महाराष्ट्र आणि कर्नाटकात फडकवली आहे.

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी व्यसनमुक्ती व शाकाहारासाठी प्रचंड काम केले. त्यांच्या निधनानंतर ही चळवळ थोडी मागे पडली होती. चौगले यांनी तो विचार घेऊन संस्कार मंचाच्या कार्याला सुरूवात केली. कुंथलगिरी येथे पहिले धर्मसंस्कार शिबिर घेतले. तेथून सन्मती संस्कार मंचाने धर्मसंस्काराबरोबर सामाजिक उपक्रमाला वाहून घेतले.

डॉ. बाबा आमटेंचा आनंदवन, सांगलीतील एड्स सेवा केंद्र, विविध अनाथाश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी मंचाच्या कार्यकर्त्यांना नेऊन तेथे मदतीचा हात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सांगलीच्या एड्स केंद्रात प्रत्येक दिवाळीला मंचातर्फे मुलांना साहित्याचे वाटप केले जाते. कोल्हापूरच्या नसिमा हुजरुक यांच्या अपंग सेवा केंद्रात आर्थिक मदतीबरोबरच अन्नदानासाठी मदत केली जाते. सोलापूर व पंढरपूरच्या अनाथाश्रमाला भेटी देऊन कार्यकर्त्यांचे वाढदिवस अशा आश्रमातून साजरे व्हावेत, असा संकल्प हाती घेतला आहे.

मंचाने गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या श्रवणबेळगोळ येथील महामस्तकाभिषेक सोहळ्यात दीड ते दोन हजार तरुण, वृद्ध, महिला यांनी सन्मती संस्कार मंचाच्या झेंड्याखाली स्वच्छतेची जबाबदारी यशस्वीपणे पेलली. सम्मेद शिखरजी या जैनधर्मियांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही मंचाच्यावतीने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाते.

समाजातील गोरगरिबांना सम्मेद शिखरजी, श्रवणबेळगोळ येथे मोफत दर्शन घडवले जाते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात तर मंचने मोठे काम केले आहे. निमशिरगाव येथे आचार्य शांतिसागर महाराज जयंतीनिमित्त १००८ वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा ध्यासही त्यांनी घेतला आहे.विधवांना दिला सन्मानसमाजात विधवा महिलांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यांना मानसन्मान मिळत नाही. अशा शंभरहून अधिक विधवा महिलांना एकत्र करून त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम मंचाने केले आहे. संस्कार मंचाच्यावतीने कोणताही कार्यक्रम असेल, तर त्यात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जाते. त्यांच्याहस्ते ध्वजारोहण, दीपप्रज्ज्वलन करून त्यांचा सन्मान वाढविण्याचे काम केले जात आहे. 

तीन बंधारे उभारणारमंचतर्फे दरवर्षी कुंथलगिरी येथे धर्मसंस्कार शिबिर होत असते. तसा कुंथलगिरीचा परिसर हा दुष्काळीच. गतवर्षी येथे एक बंधारा बांधला. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची व्यवस्थाही झाली. यंदा आणखी तीन नवीन बंधारे बांधण्याचा संकल्प सुरेश चौगले व त्यांच्या मंचाने सोडला आहे.