शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाळू ठेकेदारांचे बोजे उतरविणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 20, 2017 23:45 IST

सदाभाऊ खोत : पाणी योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; इस्लामपुरात आढावा बैठक

इस्लामपूर : महसूल विभागाने पूर्वी वाळवा तालुक्यातील ठेकेदारांना १५० कोटी दंडाच्या नोटिसा काढून तसे बोजे मालमत्ता उताऱ्यावर चढवले होते. मात्र शासनाच्या आदेशाशिवाय बेकायदेशीरपणे हे बोजे उतरले असतील, तर संबंधितांना निलंबित करुन त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. याचवेळी जिल्ह्यातील पाणी योजनांमध्ये गैरकारभार करणारांविरुध्द फौजदारी कारवाई करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. येथील राजारामबापू नाट्यगृहात विविध शासकीय विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी खोत यांच्यासह आमदार शिवाजीराव नाईक, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, गौरव नायकवडी, जि. प. सदस्या सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, जयराज पाटील, नंदकुमार कुंभार, एल. एन. शहा, सुखदेव पाटील, प्रा. एस. के. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.या बैठकीत मंत्री खोत यांनी, वीज, पाणी पुरवठा, रस्ते, कृषी, पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा अशा विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. २0१३ नंतरचे वीज कनेक्शन मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. निधीअभावी महावितरणची कामे रखडल्याचे त्यांनी खोत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री खोत यांनी, गुरुवारी ऊर्जामंत्र्यांशी बैठक घेऊन १५९ कोटी रुपयांच्या निधीबाबत चर्चा करू, असे स्पष्ट केले.बळीराजाच्या बी. जी. पाटील यांनी महावितरणवर टीकेची झोड उठवली. ग्राहकाला तीन महिन्यात वीज जोडणी देण्याचा विद्युत नियामक आयोगाचा आदेश आहे. मात्र या आदेशाचा अवमान होतो आहे. विजेअभावी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महादेववाडी (ता. वाळवा) या गावचा पाणी पुरवठा बंद असल्याकडे जि. प. सदस्य जगन्नाथ माळी यांनी लक्ष वेधले. त्यावर खोत यांनी, प्रांत व तहसीलदारांना तातडीने या गावाला भेट देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढा, त्यामध्ये कोणी आडवे आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी सूचना केली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये असणाऱ्या जागांचा शेतमाल खरेदी-विक्रीसाठीच वापर झाला पाहिजे. असा वापर होत नसेल तर कारवाई करा. इस्लामपूर बाजार समितीचा अहवाल लवकरात लवकर द्या, अशीही सूचना त्यांनी केली.सावळवाडी पुनर्वसन वसाहतीमध्ये २० वर्षांत विकासकामे झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. खोत यांनी, अधिवेशन संपताच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही दिली.गौरव नायकवडी म्हणाले, धरणग्रस्तांच्या अपेक्षा जास्त नाहीत, त्या तरी पूर्ण करा. मायक्रो फायनान्स कंपनीविरुध्द महिला बचत गटांनी तहसीलदारांकडे तक्रारी द्याव्यात, वसुली करायला येणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाईल, असे खोत यांनी सांगितले. (वार्ताहर)