शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

वाळू ठेकेदारांचे बोजे उतरविणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: March 20, 2017 23:45 IST

सदाभाऊ खोत : पाणी योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; इस्लामपुरात आढावा बैठक

इस्लामपूर : महसूल विभागाने पूर्वी वाळवा तालुक्यातील ठेकेदारांना १५० कोटी दंडाच्या नोटिसा काढून तसे बोजे मालमत्ता उताऱ्यावर चढवले होते. मात्र शासनाच्या आदेशाशिवाय बेकायदेशीरपणे हे बोजे उतरले असतील, तर संबंधितांना निलंबित करुन त्यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करा, असे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. याचवेळी जिल्ह्यातील पाणी योजनांमध्ये गैरकारभार करणारांविरुध्द फौजदारी कारवाई करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. येथील राजारामबापू नाट्यगृहात विविध शासकीय विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठक झाली. यावेळी खोत यांच्यासह आमदार शिवाजीराव नाईक, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सविता लष्करे, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, गौरव नायकवडी, जि. प. सदस्या सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, जयराज पाटील, नंदकुमार कुंभार, एल. एन. शहा, सुखदेव पाटील, प्रा. एस. के. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.या बैठकीत मंत्री खोत यांनी, वीज, पाणी पुरवठा, रस्ते, कृषी, पुनर्वसन, अन्न व नागरी पुरवठा अशा विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे अधीक्षक अभियंता आर. डी. चव्हाण यांनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. २0१३ नंतरचे वीज कनेक्शन मागणीचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. निधीअभावी महावितरणची कामे रखडल्याचे त्यांनी खोत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री खोत यांनी, गुरुवारी ऊर्जामंत्र्यांशी बैठक घेऊन १५९ कोटी रुपयांच्या निधीबाबत चर्चा करू, असे स्पष्ट केले.बळीराजाच्या बी. जी. पाटील यांनी महावितरणवर टीकेची झोड उठवली. ग्राहकाला तीन महिन्यात वीज जोडणी देण्याचा विद्युत नियामक आयोगाचा आदेश आहे. मात्र या आदेशाचा अवमान होतो आहे. विजेअभावी शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.महादेववाडी (ता. वाळवा) या गावचा पाणी पुरवठा बंद असल्याकडे जि. प. सदस्य जगन्नाथ माळी यांनी लक्ष वेधले. त्यावर खोत यांनी, प्रांत व तहसीलदारांना तातडीने या गावाला भेट देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढा, त्यामध्ये कोणी आडवे आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी सूचना केली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये असणाऱ्या जागांचा शेतमाल खरेदी-विक्रीसाठीच वापर झाला पाहिजे. असा वापर होत नसेल तर कारवाई करा. इस्लामपूर बाजार समितीचा अहवाल लवकरात लवकर द्या, अशीही सूचना त्यांनी केली.सावळवाडी पुनर्वसन वसाहतीमध्ये २० वर्षांत विकासकामे झाली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. खोत यांनी, अधिवेशन संपताच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवू, अशी ग्वाही दिली.गौरव नायकवडी म्हणाले, धरणग्रस्तांच्या अपेक्षा जास्त नाहीत, त्या तरी पूर्ण करा. मायक्रो फायनान्स कंपनीविरुध्द महिला बचत गटांनी तहसीलदारांकडे तक्रारी द्याव्यात, वसुली करायला येणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाईल, असे खोत यांनी सांगितले. (वार्ताहर)