शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज नाकारणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:39 IST

सांगली : खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना पीककर्ज मिळाले पाहिजे, जिल्हा बँकेने सर्वाधिक ६५ टक्के कर्जपुरवठा केला असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले. शेतकºयांना पीककर्ज नाकारणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाईबाबत सूचना जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ...

सांगली : खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना पीककर्ज मिळाले पाहिजे, जिल्हा बँकेने सर्वाधिक ६५ टक्के कर्जपुरवठा केला असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले. शेतकºयांना पीककर्ज नाकारणाºया राष्ट्रीयीकृत बँकांवर कारवाईबाबत सूचना जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्या बँकांची विभागीय स्तरावर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बुधवारी जिल्हा परिषदेच्या विविध कामांचा आढावा म्हैसेकर यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे उपस्थित होते.डॉ. म्हैसेकर म्हणाले की, पाऊस विलंबाने सुरू झाल्याने पेरण्या लांबल्या होत्या. जिल्ह्यात ६३१ खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांना पीककर्ज हवे आहे. पीककर्जाबाबतच्या सूचना जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आल्या होत्या. जिल्ह्याला एक हजार १७० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत अवघे ३५० कोटींचे कर्जवाटप झाले. राष्ट्रीयीकृत बँकांनी पीककर्ज वाटपाचे अद्याप केवळ २० ते २५ टक्केच उद्दिष्ट गाठले असल्याचे स्पष्ट झाले. या बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. बँकेकडे कर्ज मागणाºया शेतकºयांना कर्ज मिळाले पाहिजे. तांत्रिक अडचण नसेल तर, कर्ज नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांंनी वेळोवेळी माहिती सादर केली पाहिजे. पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाºया बँकांवर कारवाईबाबतचा कानमंत्र जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे. तसेच विभागीय स्तरावर स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे.सात-बारा उताºयासाठी अडवणूक नकोखरीप हंगाम सुरू आहे, मात्र अनेक गावात सात-बारा मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. सात-बारा आॅनलाईनचे काम सुरू आहे, त्यामुळे तांत्रिक अडचणी आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे शेतकºयांना तात्काळ सात-बारा देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. सात-बारासाठी अडवणूक होत असल्यास थेट तहसीलदार अथवा जिल्हाधिकाºयांकडे शेतकºयांनी तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर लगेच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.जिल्ह्यात तलाठ्यांचे ५७ नवीन सजेजिल्ह्यातील शेतकºयांची गैरसोय दूर करण्यासाठी तलाठ्यांचे ५७ नवीन सजे तयार केले असून, त्यास शासनाने मंजुरीही दिली आहे. यातून संख आणि आष्टा येथील अप्पर तहसील कार्यालयांसाठीही कर्मचाºयांची पदे मंजूर करून देण्यात येणार आहेत. यामुळे या परिसरातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांची सोय होणार आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार वाळू उपसा सुरू करूवाळू उपसा बंद असल्याने लोकांची गैरसोय होत आहे, परंतु अवैध मार्गाने वाळूचा पुरवठा सुरू आहे. उपसा बंद राहिल्याने महसुलावर परिणाम होत आहे. सांगली जिल्ह्यात १३१ वाळू उपशाची ठिकाणे निश्चित झाली आहेत. हरित न्यायालयाच्या निकषानुसार वाळू उपसा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.