शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST

कुपवाड : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक उत्पादन घेणारे आणि सध्या एक्स्पोर्ट सुरू असलेले उद्योग व त्यांना कच्या मालाचा ...

कुपवाड : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक उत्पादन घेणारे आणि सध्या एक्स्पोर्ट सुरू असलेले उद्योग व त्यांना कच्या मालाचा पुरवठा करणारे उद्योग सुरू राहतील. मात्र, जे उद्योग वरीलप्रमाणे कोणत्याही वर्गवारीमध्ये बसत नाहीत, त्यांना उद्योग सुरू करता येणार नाहीत. ज्यांच्या कारखान्यात कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था आहे, असेच इतर उद्योग सुरू राहतील. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी उद्योजकांच्या बैठकीत दिला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली

जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, बामनोली इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत चिमड, सदाशिव मलगान, मिरज एमआयडीसीचे अध्यक्ष संजय अराणके, माधव कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाथिकारी चौधरी म्हणाले की, अत्यावश्यक उत्पादन घेणारे उद्योग, एक्स्पोर्ट उद्योग, पॅकिंग उद्योग, सलग प्रक्रियामधील उद्योग व त्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करणारे उद्योग सुरू राहतील. त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या उद्योगांनी अत्यावश्यक व सलग प्रक्रिया उद्योगांची जिल्हा उद्योग केंद्राकडून घेतलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येईल, तसेच जे उद्योग वरीलप्रमाणे कोणत्याही वर्गवारीमध्ये बसत नाहीत, त्यांना उद्योग सुरू करता येणार नाहीत; परंतु ज्यांच्या कारखान्यात कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था आहे, असे उद्योग सुरू राहतील, असे सूचित करण्यात आले आहे.

चाैकट

तपासणीसाठी पथके तयार

यापुढील काळात कारखानदारांकडून कोरोनासंबंधी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यावर लक्ष ठेवयासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रात पाहणी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व औद्योगिक महामंडळ यांच्यामार्फत तपासणी पथके तयार केली आहेत. उद्योजकांनी यासंदर्भात अधिक माहितीसाठी अथवा कोणत्या अडचणी असतील तर असोसिएशन, चेंबर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्योजकांनी केले आहे.