शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:26 IST

इस्लामपूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदारांबरोबर कारखान्याचा करार होतो. यावेळी संबंधीत कंत्राटदारांना ऊस ...

इस्लामपूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदारांबरोबर कारखान्याचा करार होतो. यावेळी संबंधीत कंत्राटदारांना ऊस तोडणीचे पैसे रितसर दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना पैस देण्याची गरज नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तोडणीसाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी केले. वाहतूकदार आणि तोडणी मजुरांच्या पैशाबाबत संचालक मंडळाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, तोडणी कंत्राटदारांनी शेतकऱ्यांकडे पैसे मागितल्याची एकही लेखी तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उरत नाही. मात्र जर कोणी पैसे मागितल्याची किंवा घेतल्याची लेखी तक्रार दिली, तर निश्चितपणे संबंधीत तोडणी कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. या गळीत हंगामात उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्या तुलनेत तोडणी मजुरांची संख्या कमी आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती असल्याने शेतकरी आपला ऊस लवकर तुटावा यासाठी प्रयत्नशील असतो. त्याच्या या अडचणीचा फायदा काही तोडणी कंत्राटदार, मजूर उचलत आहेत. प्रत्येक हंगामात शेवटच्या टप्प्यात पैसे घेऊनच ऊस तोडला जात असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. मोठे शेतकरी यापद्धतीने आपला ऊस तोडून घेतात. त्यामुळेच तोडणी कंत्राटदार आणि मजूर पैशांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे प्रकार घडत आहेत.

चौकट

शंभर टक्के उसाचे गाळप

माहुली म्हणाले, या गळीत हंगामात संपूर्ण क्षेत्रातील ऊस तुटल्याशिवाय हंगाम बंद होणार नाही. तशी तोडणी व्यवस्था कारखान्याने केली आहे. त्यामुळे ऊस तोडणीसाठी कोणीही शेतकऱ्यांनी पैसे देऊ नयेत. पैसे मागितल्याची तक्रार आल्यास कारखाना प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल.