शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST

जत : ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी कोरोना संसर्ग व प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना गावात सभा घेण्यासाठी एक चारचाकी गाडी व दोन ...

जत : ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी कोरोना संसर्ग व प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना गावात सभा घेण्यासाठी एक चारचाकी गाडी व दोन दुचाकी मोटारसायकल आणि केवळ पन्नास नागरिकांना सभेसाठी उपस्थित राहता येणार आहे, याव्यतिरिक्त वाहनांचा वापर झाल्यास आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव यामुळे ग्रामपंचायत निवडणूक प्रचार यंत्रणा व आचारसंहितेत फेरबदल झाले आहेत. प्रचार कालावधित मोठ्या सभा उमेदवाराला घेता येणार नाहीत. जर सभा घेतली, तर त्यासाठी पन्नास नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे. निवडणूक प्रचारात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून निवडणूक आयोगाने खबरदारी घेऊन आचारसंहिता लागू केली आहे. घरोघरी फिरून प्रचार करण्यासाठी उमेदवारांसह फक्त पाच कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. जादा कार्यकर्ते आढळून आले, तर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग झाल्याचा ठपका ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी एकत्र येणे, मिरवणुकीचे आयोजन करणे यासाठी वेगळे निकष लावण्यात आले आहेत. पन्नास नागरिकांची सभा घेण्याचे नियोजन असल्यास त्यासाठी मैदानाची पाहणी, सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून त्या मैदानावर चिन्हांकित खुणा करण्यात येणार आहेत. याशिवाय मेळाव्यासाठी उपस्थित असणारे नागरिक व उमेदवार यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात की नाही, याची सतत पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक खबरदारीची उपाययोजना म्हणून फेस मास्क, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर आदी उपाययोजना उमेदवाराला कराव्या लागणार आहेत. याचे उल्लंघन करता येणार नाही. उल्लंघन झाले, तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही तहसीलदार सचिन पाटील यांनी दिला आहे.