शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

मेणीजवळच्या दोन युवकांचा मुंबईत अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : कामावरून घरी परतत असताना अंगावरून दहाचाकी ट्रक गेल्याने शिराळा तालुक्यातील सावंतवाडी आणि आटुगडेवाडी (मेणी) येथील दोन माथाडी युवकांचे जागीच निधन झाले. ही घटना नाशिक रोडवरील वरई टोलनाक्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथील विक्रम राजाराम दीपक (वय ३२) व आटुगडेवाडी (मेणी) येथील रवींद्र ऊर्फ पप्पू सर्जेराव आटुगडे (२६, दोघेही सध्या रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) मुंबई येथील ट्रान्सपोर्टमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होते. सध्या त्यांची कामगार म्हणून नियुक्ती वसई (जि. ठाणे) येथे असल्याने ते मोटारसायकलवरून दररोज ये-जा करत होते. रोजच्या प्रमाणे ते कामावरून घरी कोपरखैरणे येथे येत असताना वरई टोलनाक्याजवळ पावसाने वाहून रस्त्यात आलेल्या चिखलात गाडी घसरली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दहाचाकी ट्रकने त्यांना जागीच चिरडल्याने मोठा रक्तस्राव होऊन जागीच निधन झाले.

विक्रम याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार वर्षांचा मुलगा, दहा महिन्याची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रवींद्र आटुगडे याचे गेल्याच वर्षी लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. दोघांचेही आईवडील गावी असतात. दोघांच्या अपघाती निधनाने सावंतवाडी आणि आटुगडेवाडी या गावांवर शोककळा पसरली आहे.