शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अबब... घरगुती विजेचे बिल दीड लाख रुपये!

By admin | Updated: December 14, 2015 00:07 IST

शिराळ्यातील प्रकार : दुरुस्तीनंतरही ४६ हजार रुपये माथी

विकास शहा--शिराळा तालुक्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाने हैराण झाला असतानाच, वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना आता बिलाचा झटका बसत आहे. वीज कंपनीने एका शेतकऱ्याला घरगुती वापरापोटी हजार, दोन हजार नव्हे, तर तब्बल दीड लाख रुपयांचे वीजबिल दिले आहे. येथील महादेव ज्ञानू नलवडे (रा. शिराळा) हे सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या घरामध्ये चार ट्यूब, टीव्ही व फ्रीज ही उपकरणे आहेत. त्यांचा आजअखेर वीज वापर ६० युनिटच्या घरातच आहे. मात्र नाव्हेंबर २०१५ च्या बिलामध्ये ९१५१ युनिट आणि त्याचे बिल १ लाख ४६ हजार ७८० रुपये आले आहे. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याने एवढ्या बिलाची रक्कम आणायची कुठून?, असा सवाल नलवडे करीत आहेत. हे बिल वीज वितरणकडून दुरुस्त करुन घेतले, पण ४६ हजार ५४० रुपयांपर्यंतच कमी करून देण्यात आले आहे. परंतु एवढीसुद्धा रक्कम आणणार कुठून?, हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मीटरचा दोष असेल तर मीटर बदलण्याची जबाबदारी कंपनीची आहे. पांडुरंग महादेव नांगरे यांचे २४ हजार ५१०, तर दिलीप रघुनाथ नलवडे यांचे २४ हजार तीनशे, अशी एक महिन्याची बिले देण्यात आली आहेत. कंपनीमार्फत चुक ीची बिल आकारणी करून ग्राहकांना का वेठीस धरले जात आहे? जर मीटरमध्ये दोष असेल तर, कंपनीने ही मीटर बदलणे गरजेचे आहे. मात्र ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. टेस्ट रिपोर्टसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यापासून सुटका होणार, की वीज बिलासाठी आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची? असा सवाल शेतकऱ्यांकडून प्रशासनाला विचारला जात आहे. ग्राहकांनाच मिळतो सल्ला...कंपनीमार्फत मीटरचे छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र या बिलावर छापलेही जाते. मात्र मीटरचा दोष आहे की छपाईचा दोष आहे, याचीही तपासणी केली जात नाही. आहे त्याच परिस्थितीत बिल वितरित केले जाते. बिलामध्ये काही चुका असल्या, तर ग्राहकाला कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. यावेळी अधिकारीवर्ग उपस्थित असले तर ठीक, नाही तर पुन्हा हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नसतो. बिलामधील दुरुस्ती दाखवली तरी, अधिकारी मात्र आहे ते बिल भरा,नंतरच्या बिलामध्ये बघून घेऊ, असा सल्ला देतात.