शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

आबांच्या विचारांचे लोक आमच्यासोबतच

By admin | Updated: October 20, 2015 00:17 IST

स्मिता पाटील : स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना त्यांची जागा कळेल

प्रवीण पाटील - सावळज--तासगाव - कवठेमहांकाळमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला; मात्र तासगाव-कवठेमहांकाळमधील आर. आर. पाटील आबांच्या विचारांवर प्रेम करणारी जनता आमच्याबरोबर आहे. आबांच्या जिवावर जे मोठे झाले व जे आज फक्त स्वार्थापोटी पक्ष बदलत आहेत, त्यांना येणाऱ्या काळात सूज्ञ जनताच त्यांची जागा दाखवून देईल. तासगाव बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जो इतिहास घडवला, त्याचीच पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.गेल्या काही दिवसांपासून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते; मात्र स्मिता पाटील यांनी स्वार्थासाठी पक्ष बदललेल्यांचा खरपूस समाचार घेतला. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट बघून प्रत्येक क्षणाला आबांची उणीव भासते. सध्याचे सरकार भांडवलदार, उद्योगपतींचे सरकार असून, गोरगरीब शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सोडाच; पण आबांच्या काळात पूर्ण झालेल्या पाणी योजनाही सध्याच्या सरकारच्या कुचकामी धोरणामुळे बंद पडण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी व भांडवलदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना व गोरगरिबांना अच्छे दिन कधी येणार? असा सवाल स्मिता पाटील यांनी केला. आबांचे सर्व सहकारी, आ. सुमनताई पाटील व सुरेशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढच्या काळात काम करू, असा विश्वास स्मिता पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.मी, सुरेशभाऊ सुमनतार्इंचे कार्यकर्तेआबांच्यानंतर आमच्या कुटुंबातील तिहेरी नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र मी व सुरेशभाऊ दोघेही सुमनतार्इंचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत असून, आमच्यातील मतभेदाच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. येणाऱ्या काळातही तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील, असे स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले.कार्यकर्त्यांना बळ देणारआबासाहेबांच्या अकाली जाण्याचे दु:ख, संकट व जबाबदाऱ्या या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे, गेले आठ महिने यातून सावरण्यात गेले. मात्र यापुढे शंभर टक्के राजकारणात सक्रिय राहून कार्यकर्त्यांना बळ देऊ, असा विश्वास स्मिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.