शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

आबांच्या विचारांचे लोक आमच्यासोबतच

By admin | Updated: October 20, 2015 00:17 IST

स्मिता पाटील : स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना त्यांची जागा कळेल

प्रवीण पाटील - सावळज--तासगाव - कवठेमहांकाळमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला; मात्र तासगाव-कवठेमहांकाळमधील आर. आर. पाटील आबांच्या विचारांवर प्रेम करणारी जनता आमच्याबरोबर आहे. आबांच्या जिवावर जे मोठे झाले व जे आज फक्त स्वार्थापोटी पक्ष बदलत आहेत, त्यांना येणाऱ्या काळात सूज्ञ जनताच त्यांची जागा दाखवून देईल. तासगाव बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जो इतिहास घडवला, त्याचीच पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.गेल्या काही दिवसांपासून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते; मात्र स्मिता पाटील यांनी स्वार्थासाठी पक्ष बदललेल्यांचा खरपूस समाचार घेतला. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट बघून प्रत्येक क्षणाला आबांची उणीव भासते. सध्याचे सरकार भांडवलदार, उद्योगपतींचे सरकार असून, गोरगरीब शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सोडाच; पण आबांच्या काळात पूर्ण झालेल्या पाणी योजनाही सध्याच्या सरकारच्या कुचकामी धोरणामुळे बंद पडण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी व भांडवलदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना व गोरगरिबांना अच्छे दिन कधी येणार? असा सवाल स्मिता पाटील यांनी केला. आबांचे सर्व सहकारी, आ. सुमनताई पाटील व सुरेशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढच्या काळात काम करू, असा विश्वास स्मिता पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.मी, सुरेशभाऊ सुमनतार्इंचे कार्यकर्तेआबांच्यानंतर आमच्या कुटुंबातील तिहेरी नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र मी व सुरेशभाऊ दोघेही सुमनतार्इंचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत असून, आमच्यातील मतभेदाच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. येणाऱ्या काळातही तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील, असे स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले.कार्यकर्त्यांना बळ देणारआबासाहेबांच्या अकाली जाण्याचे दु:ख, संकट व जबाबदाऱ्या या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे, गेले आठ महिने यातून सावरण्यात गेले. मात्र यापुढे शंभर टक्के राजकारणात सक्रिय राहून कार्यकर्त्यांना बळ देऊ, असा विश्वास स्मिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.