शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

आटपाडीत खासगी स्पर्धा परीक्षांवर बंदी

By admin | Updated: July 10, 2015 23:51 IST

पंचायत समितीचा आदेश : शालेय विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार

अविनाश बाड -आटपाडी -विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खासगी स्पर्धा परीक्षांवर आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तालुक्यात बंदी घातली आहे. तालुक्यातील कोणत्याही शाळेत खासगी स्पर्धा परीक्षा घेऊ नयेत, असा आदेश विभागाने दिला आहे. त्यामुळे आता पालकांची आर्थिक लूट आणि विद्यार्थ्यांवरील अकारण ताण थांबणार असला तरी, कमिशनला चटावलेल्या गुरुजींचे चेहरे मात्र पडले आहेत.शासनाचा शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा परिषदेची मान्यता नसताना, वेगवेगळ्या खासगी संस्था पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेऊन वेगवेगळ्या खासगी स्पर्धा परीक्षांचे आयोजन काही वर्षांपासून करीत आहेत. एकीकडे शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांची आवड व कल लक्षात घेऊन शिक्षण देणे बंधनकारक असताना, गेल्या काही वर्षांपासून अकारण खासगी स्पर्धा परीक्षांचा सुळसुळाट झाला आहे. काही पालकांनाही अशा परीक्षांमध्ये विद्यार्थ्याने गुण मिळविले की, दुसरी-तिसरीतला मुलगा जिल्हाधिकारी झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत. वास्तविक अशा परीक्षांमुळे लहान मुलांच्या बालमनावर परीक्षा आणि पालकांच्या अपेक्षांमुळे अकारण तणाव वाढत आहे. यातून भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. शासनाने चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. खासगी परीक्षा मात्र दुसरीपासून घेण्याचा पायंडाच पडला होता. खासगी स्पर्धा परीक्षा घेणारे शाळांतून येऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे टक्केवारी देऊन व अन्य आमिषे दाखवून तयार करायचे, मग शिक्षक पालकांना व विद्यार्थ्यांना पटवायचे. ४० रुपये किमतीचे पुस्तक ४०० रुपयांना माथी मारून परीक्षा शुल्काच्या नावाखाली पालकांची लूट सुरू होती. वार्षिक अभ्यासक्रम संपविणे हेच जरूरीचे आणि बदलत्या शिक्षण पध्दतीमुळे जिकिरीचे बनलेले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना कोठेही खासगी स्पर्धा परीक्षेचे ज्ञान देत नव्हते. टक्केवारी घेतल्यानंतर वर्षातून एकदा एका ठिकाणी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि निकालाबद्दलही शंका उपस्थित होत होत्या. मुले अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत, पण शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मात्र ही मुले कोठेच दिसत नव्हती.कोणत्याही शाळेकडे अथवा शिक्षकाकडे कोणताही व्यापार करण्याचा परवाना नसतो. त्यामुळे शासकीय परीक्षांशिवाय इतर कोणत्याही खासगी स्पर्धा परीक्षा घेणे, त्यासाठी पुस्तके विकत घेणे, ती विद्यार्थ्यांना विकत देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील सर्व केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन, कोणत्याही शाळेत खासगी स्पर्धा परीक्षा घेऊ नयेत, अशी सक्त सूचना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी स्वत: प्रश्नपत्रिका काढून चाचणी परीक्षा घ्याव्यात.- आर. आर. आटुगडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आटपाडी गुरुजी तुम्हीसुध्दा?सध्या अनेक गुरुजी वेगवेगळ्या साखळी योजनांतून पत्नीच्या नावे ‘एजंट’ होऊन पैसा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बहुतांशी शिक्षक आमिषापोटी भुलत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे शाळा बंद पडत असताना, आटपाडी शिक्षण विभागाने तालुक्यात खासगी स्पर्धा परीक्षांना पायबंद घालून नवा आदर्श निर्माण केला आहे.