शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सांगलीतील ९५ वर्षांचा ‘तरुण’ जलतरणात अव्वल

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

सुवर्णपदकांची कमाई : राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग, स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो आणि जिंकूनच परत येतो !

नरेंद्र रानडे - सांगली -वयाच्या आठव्या वर्षापासून पोहण्याची आवड जोपासणाऱ्या सांगलीतील ९५ वर्षीय ‘तरुणा’कडे जलतरण स्पर्धेतील सुवर्ण व रौप्यपदकांचा ढीग आहे! अजूनही ज्येष्ठांच्या जलतरण स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. देशातील कोठेही स्पर्धा जाहीर झाली की हा ‘तरुण’ स्थळ, वेळ आणि वयाचा विचार न करता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतो आणि जिंकण्याच्याच आत्मविश्वासाने पाण्यात उडी मारतो! आणि हमखास सुवर्णपदक पटकावूनच सांगलीला परत येतो. त्याचे नाव आहे, मारुती चुडाप्पा कांबळे.मारुती कांबळे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२१ चा. त्यांचे लहानपण कृष्णेच्या किनारीच गेले. लहानपणी वडिलांबरोबर ते कृष्णा नदीत पोहायला जायचे आणि मग त्यांना त्याची आवडच लागली. शिक्षण चौथीपर्यंतच झाले असले, तरी त्यांना व्यायामाची आवड होती. नियमित सूर्यनमस्कार, जोर आणि बैठका घातल्याचा लाभ त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात होत आहे. सध्यादेखील त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे. सकाळी चार वाजता उठून योगासने, वृत्तपत्र वाचन, त्यानंतर गणेशनगर येथील जलतरण तलावात सुमारे अर्धा तास पोहणे. दुपारी सायकलवरून वेलणकर अनाथालयात सेवा म्हणून कार्य करणे. सायंकाळी हलका आहार व विश्रांती. तरुण वयात त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. १९४२ मध्ये ते पोलीस दलात होते. त्याकाळी ब्रिटिश सरकारने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना तुरुंगात ठेवले होते. त्या बराकीचे पहारेकरी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. कालांतराने १९४७ मध्ये पोलिसी सेवेला रामराम ठोकला. तद्नंतर त्यांनी एक्साईज खाते, नगरपालिका, आरवाडे हायस्कूलमध्ये कर्मचारी म्हणून, तर रामभाऊ भिडे जलतरण केंद्रात वॉचमन म्हणून नोकरी केली. या सर्व कार्यकाळात त्यांनी पोहण्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. १९८८ पासून ज्येष्ठांसाठीच्या जलतरण स्पर्धा घेण्यात येऊ लागल्या आणि प्रतिवर्र्षी मारुती कांबळे त्यात सहभागी होऊ लागले. आज ९५ व्या वर्षातदेखील त्यांची तब्येत उत्तम असल्याने विविध राज्यस्तरीय व देशपातळीवरील स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांना बक्षिसाचे विशेष आकर्षण नाही. जलतरणपटू नव्हे, तर... २६ जानेवारी १९७६ पासून दोनशे दिवस कांबळे यांनी सायकलवरून भारत भ्रमणयात्रा केली आहे.१९९० मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथील पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता.गुलबर्गा येथील स्पर्धेत सुवर्णपदकप्रामुख्याने जलतरणामधील ४०० व २०० मीटर फ्रीस्टाईल, ५० मीटर बटरफ्लाय आणि ५० मीटर बॅक या प्रकारात मारुती कांबळे यांचे विशेष प्राविण्य आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी गुलबर्गा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे, तर जानेवारीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील ते सहभागी होणार आहेत. आतापर्यंत त्यांनी १६ हून अधिक राष्ट्रीय तसेच विविध राज्यस्तरीय आणि विविध संघटनांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.१९५० मध्ये गिरगाव ते वर्सोवा या वीस मैल अंतराच्या समुद्री मार्गात आयोजित केलेल्या स्पर्धेत मारुती कांबळे यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी दहा मैल अंतर लिलया पार केले परंतु नदीत पोहण्याची सवय असल्याने नंतर पायात गोळे येऊ लागले. परिणामी त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली.पोहणे व सायकलिंग व्यायामप्रकार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कित्येक वर्षांपासून माझा पोहण्याचा नियमित व्यायाम आहे. भविष्यकाळातदेखील नियमित पोहण्याच्या दिनक्रमात खंड पडू देणार नाही. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळविण्याचा मानस आहे.-मारुती कांबळे, ज्येष्ठ जलतरणपटू