शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

९३ हजार कुटुंबं जातात उघड्यावर शौचाला!

By admin | Updated: April 5, 2015 00:05 IST

शौचालयांबाबत अनास्था : उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यातील ९३ हजार ८०४ कुटुंबांकडे अजूनही शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जात असल्याचे विदारक चित्र पुढे आले आहे. गेल्या चार वर्षांत ७०४ गावांपैकी ४७५ गावे शंभर टक्के निर्मल झाली असून, २२९ गावे निर्मलग्राम करण्यासाठी स्थानिक आणि जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) हा राष्ट्रीय कार्यक्रम २ आॅक्टोबरपासून देशभरात सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रत्येकाच्या घरी शौचालय असणे, त्याचा निरंतर वापर करणे असे चित्र निर्माण करण्यासाठी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान दिले जाते, मात्र महागाई लक्षात घेता शासनाचे अनुदान अत्यल्प आहे. त्यामुळे या उपक्रमाला पाहिजे तेवढे यश मिळाले नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ८५६ कुटुंबांंपैकी २ लाख ८८ हजार ५२ कुटुंबे शौचालयाचा वापर करीत आहेत. पलूस तालुका शंभर टक्के शौचालययुक्त झाला असून, खानापूर तालुक्यातील एक गाव सोडल्यास अन्य गावे निर्मलग्राम झाल्याचा फेब्रुवारी २०१५ चा अहवाल आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील ९३ हजार ८०४ कुटुंबांकडे शौचालय नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ८५६ कुटुंबांपैकी वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५२ हजार ८५८ कुटुंबांकडे शौचालय असून, आटपाडी तालुक्यात सर्वात कमी शौचालये आढळून आली. या तालुक्यात केवळ १७ हजार ९० कुटुंबांकडे शौचालय आहे. येथील आठ हजार ३४६ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जात आहेत. ग्रामीण व शहरी भागाकरिता शौचालययुक्त गाव ही संकल्पना १०० टक्के अमलात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून २ आॅक्टोबर २०१९ पर्यंतचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता, यासाठी शासन व प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे. २०१७-१८ पर्यंत जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त करण्याचे उद्दिष्ट पाणी व स्वच्छता अभियान कक्षाने ठेवले आहे. सध्याची गती पहाता ते पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.