शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

११ दिवसांत ९0 कोटींचा डोंगर

By admin | Updated: March 15, 2015 00:29 IST

एलबीटीचा प्रश्न : महापालिकेच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

सांगली : चालू आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट घेऊन चालणाऱ्या एलबीटी विभागाची चिंता आता वाढली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असले तरी त्यातील चार शासकीय सुट्ट्या वगळता केवळ ११ दिवसच वसुलीसाठी महापालिकेच्या हाती राहिले आहेत. सध्याची महापालिकेची वसुली ६१ कोटींच्या घरात आहे. केवळ चालू वर्षाचे उद्दिष्ट गाठायचे झाले तरीही अकरा दिवसात ९० कोटी रुपये वसूल कसे होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. महापालिकेच्या एलबीटीचा प्रश्न आता क्लिष्ट बनला आहे. राज्य शासनाने एप्रिलपासून हा कर बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेची चिंता अधिक वाढली आहे. कर संपुष्टात आल्यानंतरही महापालिकेला केवळ थकबाकी वसुलीसाठी हा विभाग जिवंत ठेवावा लागणार आहे. गत आर्थिक वर्षाची ६८ कोटी आणि चालू वर्षाचे १५० कोटी आणि थकबाकीवरील दंड व व्याज यांचा विचार केल्यास महापालिकेला अडीचशे कोटींवर वसुली करावी लागणार होती. चालू उद्दिष्टापैकी केवळ ६१ कोटी रुपये महापालिकेने वसूल केले आहेत. दंड व व्याज तूर्त बाजूला केले तरीही प्रशासकीय अंदाजानुसार आणखी ९० कोटी रुपये वसुली होणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षात चार सुट्ट्या वगळता केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. म्हणजे दररोज किमान नऊ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. तेवढी वसुली होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. सध्याच्या वसुलीचा वेग पाहता उर्वरित ११ दिवसात १० कोटी रुपये तरी जमा होतील की नाही, याची शंका आहे. त्यामुळे किमान ८० कोटींच्या थकबाकीचा फटका यंदा महापालिकेला बसणार आहे. याशिवाय मागील ६८ कोटी रुपयांच्या थकबाकीचीही चालू थकबाकीत भर पडणार आहे. त्यामुळे डोेकेदुखी अधिक वाढणार आहे. (प्रतिनिधी)