शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

प्रवासी नसल्यामुळे एसटीच्या ८८ फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे ...

सांगली : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे जिल्ह्यातील दहा आगारांतील एसटीच्या ८८ फेऱ्या आणि २५ हजार ३२९ किलोमीटर अंतर कमी केले आहे, अशी माहिती सांगली विभागाचे विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे नागरिकांनी प्रवास कमी केला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड, उस्मानाबाद या मार्गावर धावणाऱ्या बसेसना प्रवासीच नाहीत. या मार्गावरील बसला नेहमी प्रवाशांची गर्दी होती. गेल्या आठवड्यापासून या मार्गावरील बसेसला ६० ते ७० टक्के प्रवासी कमी झाले आहेत. ३० ते ३५ टक्के प्रवाशांवर लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस सोडणे परवडत नाही. यामुळे लांब पल्ल्यासह जिल्ह्यातील ८८ एसटी बसच्या फेऱ्या सोमवार, दि. ५ एप्रिलपासून बंद केल्या आहेत. तसेच विविध मार्गांवरील प्रवासी संख्या कमी असल्यामुळे २५ हजार ३२९ किलोमीटर अंतर बसेसचे कमी केले आहे. यामुळे एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे; पण कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अडचणी वाढल्याचेही अरुण वाघाटे म्हणाले.

चौकट

आगारनिहाय रद्द फेऱ्या

आगार रद्द फेऱ्यांची संख्या रद्द किलोमीटर

सांगली ५ १५४९

मिरज १५ ३१६३

इस्लामपूर ११ ३४८९

तासगाव १४ ३७७५

विटा १५ ४११४

जत ५ १९२५

आटपाडी ६ १८६७

क.महांकाळ ९ ३०४६

शिराळा ३ १०५७

पलूस ३ १०५६

सांगली शहरी बस २२७

मिरज शहरी बस ६१

एकूण ८८ २५३२९