शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी ८३% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने आणि ईर्षेने सुमारे ८३.३२ टक्के मतदान झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी १०,०५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कडेगाव, वाळवा, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीआणि वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित तालुक्यांत शांततेत मतदान झाले. मतमोजणी आज (मंगळवारी) ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील ४२४ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने आणि ईर्षेने सुमारे ८३.३२ टक्के मतदान झाले. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी १०,०५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. कडेगाव, वाळवा, तासगाव आणि खानापूर तालुक्यांत भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारीआणि वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित तालुक्यांत शांततेत मतदान झाले. मतमोजणी आज (मंगळवारी) तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. दुपारी चारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत.जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतींपैकी २९ बिनविरोध झाल्यामुळे ४२४ गावांमध्ये सरपंचपदासाठी ११४१ उमेदवार रिंगणात उतरले होते. ग्रामपंचायत सदस्यांच्या १६३० जागांपैकी ३८९ सदस्य बिनविरोध निवडून आल्यामुळे १२४१ जागांसाठी ८९८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी सोमवारी मतदान झाले. सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. दुपारनंतर मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांसमोर मतदारांच्या रांगाच्या-रांगा लागल्या होत्या. उमेदवारांनी बाहेरगावच्या मतदारांसाठी मोटारी, खासगी बसेसची सोय केली होती. जिल्ह्यात ११.३० पर्यंत ३६.३५ टक्के, तर दुपारी दीडपर्यंत ५७.९३ टक्के आणि साडेतीनपर्यंत ७२.९७ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी साडेपाचला वेळ संपताना ८३.३२ टक्के मतदान झाले होते. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ८६.९८ टक्के, तर सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७९.१७ टक्के मतदान झाले. जत तालुक्यातील संख येथे रात्री ८.४९ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. येथे पावसामुळे मतदानासाठी अडथळा आल्यामुळे मतदारांना केंद्रावर येण्यास उशीर झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला असतानाही तासगाव तालुक्यातील चिंचणी, मणेराजुरी, आरवडे, वाळवा तालुक्यातील वाटेगाव, चिंचणी, ऐतवडे खुर्द येथे मारामारी झाली. मणेराजुरी, आरवडे, वाटेगाव येथे तणावाचे वातावरण होते. खानापूर तालुक्यातील लेंगरे, भाळवणी, आळसंद, कमळापूर, गार्डी येथे बाचाबाची झाली. कमळापूर येथे बोगस मतदान करण्यासाठी येणाºया दोन गाड्या पोलिसांनी पकडल्या. कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रेत किरकोळ बाचाबाचीचा प्रकार घडला. तेथे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. संवेदनशील मतदान केंद्रांवर तणावाचे वातावरण होते. पण बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्याने कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. वाळवा तालुक्यातील मर्दवाडी, तासगाव तालक्यातील आरवाडे, पलूस तालुक्यातील सांगडेवाडीसह अनेक गावांत मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार घडले. मात्र ती तातडीने दुरुस्त करण्यात आली.जिल्ह्यात झालेले मतदान...तालुका टक्केवारीजत ८०क.महांकाळ ८६शिराळा ८६.९८वाळवा ८१.७३पलूस ८५.७३कडेगाव ८२.९६तासगाव ८४.२६मिरज ८५खानापूर ७९.१७आटपाडी ८१.७२एकूण ८३.३२