शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:31 IST

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने सरासरी ८०.२० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या गावांत ...

सांगली : जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मोठ्या चुरशीने सरासरी ८०.२० टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या गावांत निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. सोमवार दि. १८ राेजी सकाळपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १४३ ग्रामपंचायतींमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ झाला. जिल्ह्यात तासगाव, जत आणि मिरज तालुक्यात निवडणुकीत सर्वाधिक चुरस दिसून आली. त्यामुळे सकाळपासूनच या तालुक्यात मतदान केंद्रांवर गर्दी होती. दुपारी गर्दी थोडी ओसरली, पण चारनंतर पुन्हा एकदा मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना कसरत करावी लागली.

जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात लेंगरेवाडीत मतदान केंद्राबाहेर काही वेळ गोंधळ झाला होता. यासह इतर ठिकाणी मतदारांना आपल्याकडे घेण्यावरूनही कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. पण पोलिसांनी हा गोंधळ कमी करत नियंत्रण मिळवले. सायंकाळी साडेपाचची वेळ असताना अनेक ठिकाणी मतदान बाकी असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरूच हाेते. त्यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास उशीर लागणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

दरम्यान, आता सोमवारी प्रत्यक्षात मतमोजणी करण्यात येणार असल्याने सध्या तरी जिल्ह्यातील ३०७२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.

चौकट

तालुका गावे झालेले मतदान टक्केवारी

मिरज २२ ९१, ७९४ ७८.४५

तासगाव ३६, ७६,५७७ ७९.८१

कवठेमहांकाळ १० १३०९५ ८३.६८

जत २९ ४७, ५९६ ८३.३८

आटपाडी ९ १३, ६७७ ७७.७९

खानापूर ११ १५, ३५७ ७६.११

पलूस १२ ३३, ४४८ ८२.६०

कडेगाव ९ १५, ७६९ ८०.३६

वाळवा २, २, ५४० ८५.८७

शिराळा २ ३, ५२३ ८३.०७