शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

८० गुन्हेगारांना लागला ‘मोक्का’

By admin | Updated: May 6, 2016 01:12 IST

पंधरा वर्षांतील कारवाई : आठ टोळ्यांचा समावेश

सांगली : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) हे हत्यार उपसले जात असले तरी कायद्यातील त्रुटीमुळे या कारवाईतून गुन्हेगार सहीसलामत सुटत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा वर्षात आठ टोळ्यांमधील ११५ कुख्यात गुन्हेगारांना ‘मोक्का’ लागला आहे. यातील काही प्रकरणात गुन्हेगार सहीसलामत सुटले आहेत; तर काहींचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. गुन्हेगारांना दोन ते तीन वर्षे जामीन मंजूर न झाल्याने ते कारागृहात बसले. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसला. एवढेच फलित कारवाईतून दिसून येते. संघटित गुन्हेगारी मोडीत निघावी, गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायदा राज्यात अंमलात आणला. त्यानुसार पहिल्यांदा सांगलीत २००० मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख रितेशकुमार यांनी गुंड राजा पुजारी व नगरसेवक दादासाहेब सावंत या दोन टोळ्यांना मोक्का लावण्यात आला. दोन्ही टोळ्यातील पंधरा गुन्हेगार जेरबंद झाले होते. तीन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या कायद्यान्वये सांगलीत वाटमारी करणारी हणमंत इसर्डे टोळीतील सात, सावकार भोल्या जाधव टोळीतील सात, पलूस येथील घाडगे पिता-पुत्र, इचलकरंजी येथील जावीर टोळीतील बाराजण व करेवाडी (ता. जत) येथील टोळीतील पंधराजण अशा पाच टोळ्यांना त्यांनी मोक्का लावला. दोन महिन्यापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनीही गुंड म्हमद्या नदाफ टोळीतील वीस जणांना मोक्का लावला आहे. यातील सावंत व पुजारी टोळीविरुद्ध पुण्यातील मोक्का न्यायालयात आरोपपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यांना जामीन न मिळाल्याने ते चार-पाच वर्षे कारागृहात होते. पुढे त्यांची निर्दोष मुक्तता झाली. गेल्या तीन-चार वर्षात झालेल्या कारवाईतील गुंड म्हमद्या नदाफ टोळी सोडली तर अन्य टोळ्यांतील गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात झालेल्या कारवाईत एकाही गुन्हेगारी टोळीतील गुन्हेगारांना शिक्षा झालेली दिसत नाही. (प्रतिनिधी)कायद्याचा धाक : तरीही पळवाटांचा शोध...मोक्का कायदा लावल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाते. पण पुढे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होते. त्यामुळे याचा आढावा घेतला जात नाही. या काळात गुन्हेगार जामिनावर बाहेर येतात. त्यांच्याकडून साक्षीदारांना दमदाटी करण्याचे प्रकार सुरु होतात. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे पुरावेही सादर करतात. त्यामुळे ते सहीसलामत बाहेर येतात. केवळ जामीन लवकर न मिळाल्याने दोन-तीन वर्षे ते कारागृहात बसल्याने गुन्हेगारीचा आलेख कमी राहिला आहे.‘मोक्का’ म्हणजे काय? स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संघटित होऊन हिंसाचाराचा वापर करुन धमकी देऊन केलेला गुन्हा मोक्का कारवाईत गणला जातो. मोक्का लावण्यापूर्वी या टोळीतील गुन्हेगारांविरुद्ध गेल्या दहा वर्षात किती गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे का? ते शिक्षेस पात्र आहेत का? सातत्याने गुन्हेगारी कारवाया सुरु आहेत का? हे तपासून टोळ्यांना मोक्का लावला जातो. याचा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक तयार करतात. तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठविला जातो. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर गुन्हेगारांना अटक केली जाते. ‘मोक्का’चे विशेष न्यायालय पुणे येथे आहे. त्यामुळे या कारवाईसाठी तेथील न्यायालयाचीही परवानगी घेतली जाते. न्यायालयात सर्व आरोप सिद्ध झाल्यास गुन्हेगारांना आजन्म कारावास व एक लाखाचा दंड, अशी शिक्षेची तरतूद आहे.