शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रधानमंत्री आवास’मधील ७७ टक्के घरकुले अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:10 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये देशभरात प्रधानमंत्री आवास योजना ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये देशभरात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थीस एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जात आहे. लाभार्थींनी स्वत: घरबांधणीसाठी मजुरी केल्यास त्यांना १८ हजार रुपयांपर्यंत स्वतंत्र अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. सांगली जिल्ह्यासाठी २०१६-१७ वर्षासाठी ५१७५ लाभार्थींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ग्रामीण विकास यंत्रणेने ४६०४ घरकुलांनाच मंजुरी दिली. यापैकी ९४ टक्के लाभार्थींना पहिला हप्ता, तर ७५ टक्के लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. मंजूर घरकुलांपैकी आजअखेर केवळ २९८२ घरकुले पूर्ण असून, १६२१ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही लाभार्थींना दोन हप्ते मिळूनही जागा नसल्यामुळे त्यांनी घरकुले बांधली नाहीत. उर्वरित लाभार्थींनी पैसे घेऊनही कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.२०१७-१८ वर्षामध्ये शासनाकडून १८९२ घरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी आले होते. त्यापैकी १७५५ घरकुलांच्या प्रस्तावास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ८६ टक्के लाभार्थींना पहिला, तर ३० टक्के लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. मात्र वर्षभरात केवळ २७७ लाभार्थींचीच घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १४७८ म्हणजे ७७ टक्के कामे अपूर्ण आहेत. निधीची उपलब्धता असूनही कामे अपूर्ण राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागेचा प्रश्न आहे. गावामध्ये एक गुंठा जागा खरेदी करण्यासाठी किमान चार ते पाच लाखांचा खर्च आहे. त्यामुळे जागा खरेदीची कुवत नसल्यामुळे घरकुल मंजूर असूनही ते लाभार्थी बांधू शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासनाने २०१८-१९ मध्येही जिल्ह्यातील ७३० घरकुले मंजूर आहेत. एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत आठ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे अपूर्णच आहेत.थेट लाभार्थींच्या खात्यावर पैसेराज्य शासनाकडून थेट लाभार्थींच्या खात्यावरच पैसे वर्ग केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींची यंत्रणा यातून वगळली आहे. घरकुलाचे काम सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यामध्ये लाभार्थींना पैसे दिले जात आहेत. कामाचे प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र काढून आवास सॉफ्टवेअरवर लोड केल्यानंतर लगेच लाभार्थींच्या खात्यावर पैसे वर्ग होत असल्यामुळे भ्रष्टाचारास थाराच नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांनी दिली. अपूर्ण घरकुलांच्या कामांना येत्या दोन महिन्यात गती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री आवास योजनेतील अपूर्ण कामे...तालुका २०१६-१७ २०१७-१८आटपाडी १६७ १९०जत १०८ ५४७कडेगाव ३९ २३क़महांकाळ ८४ ६१खानापूर १०६ ८मिरज ३८५ ३३७तालुका २०१६-१७ २०१७-१८पलूस १५८ ७०शिराळा १२७ ४३तासगाव १३६ ६९वाळवा ३११ १३०एकूण १६२१ १४७८