शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

‘प्रधानमंत्री आवास’मधील ७७ टक्के घरकुले अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:10 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये देशभरात प्रधानमंत्री आवास योजना ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये देशभरात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थीस एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जात आहे. लाभार्थींनी स्वत: घरबांधणीसाठी मजुरी केल्यास त्यांना १८ हजार रुपयांपर्यंत स्वतंत्र अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. सांगली जिल्ह्यासाठी २०१६-१७ वर्षासाठी ५१७५ लाभार्थींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ग्रामीण विकास यंत्रणेने ४६०४ घरकुलांनाच मंजुरी दिली. यापैकी ९४ टक्के लाभार्थींना पहिला हप्ता, तर ७५ टक्के लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. मंजूर घरकुलांपैकी आजअखेर केवळ २९८२ घरकुले पूर्ण असून, १६२१ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही लाभार्थींना दोन हप्ते मिळूनही जागा नसल्यामुळे त्यांनी घरकुले बांधली नाहीत. उर्वरित लाभार्थींनी पैसे घेऊनही कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.२०१७-१८ वर्षामध्ये शासनाकडून १८९२ घरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी आले होते. त्यापैकी १७५५ घरकुलांच्या प्रस्तावास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ८६ टक्के लाभार्थींना पहिला, तर ३० टक्के लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. मात्र वर्षभरात केवळ २७७ लाभार्थींचीच घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १४७८ म्हणजे ७७ टक्के कामे अपूर्ण आहेत. निधीची उपलब्धता असूनही कामे अपूर्ण राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागेचा प्रश्न आहे. गावामध्ये एक गुंठा जागा खरेदी करण्यासाठी किमान चार ते पाच लाखांचा खर्च आहे. त्यामुळे जागा खरेदीची कुवत नसल्यामुळे घरकुल मंजूर असूनही ते लाभार्थी बांधू शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासनाने २०१८-१९ मध्येही जिल्ह्यातील ७३० घरकुले मंजूर आहेत. एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत आठ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे अपूर्णच आहेत.थेट लाभार्थींच्या खात्यावर पैसेराज्य शासनाकडून थेट लाभार्थींच्या खात्यावरच पैसे वर्ग केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींची यंत्रणा यातून वगळली आहे. घरकुलाचे काम सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यामध्ये लाभार्थींना पैसे दिले जात आहेत. कामाचे प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र काढून आवास सॉफ्टवेअरवर लोड केल्यानंतर लगेच लाभार्थींच्या खात्यावर पैसे वर्ग होत असल्यामुळे भ्रष्टाचारास थाराच नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांनी दिली. अपूर्ण घरकुलांच्या कामांना येत्या दोन महिन्यात गती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री आवास योजनेतील अपूर्ण कामे...तालुका २०१६-१७ २०१७-१८आटपाडी १६७ १९०जत १०८ ५४७कडेगाव ३९ २३क़महांकाळ ८४ ६१खानापूर १०६ ८मिरज ३८५ ३३७तालुका २०१६-१७ २०१७-१८पलूस १५८ ७०शिराळा १२७ ४३तासगाव १३६ ६९वाळवा ३११ १३०एकूण १६२१ १४७८