शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

‘प्रधानमंत्री आवास’मधील ७७ टक्के घरकुले अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:10 IST

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये देशभरात प्रधानमंत्री आवास योजना ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०१६-१७ वर्षामधील २४ टक्के आणि २०१७-१८ वर्षातील ७७ टक्के घरकुले अपूर्ण आहेत. कामांची गती लक्षात घेतल्यास २०२२ पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये देशभरात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक लाभार्थीस एक लाख २० हजारांचे अनुदान दिले जात आहे. लाभार्थींनी स्वत: घरबांधणीसाठी मजुरी केल्यास त्यांना १८ हजार रुपयांपर्यंत स्वतंत्र अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा आहे. सांगली जिल्ह्यासाठी २०१६-१७ वर्षासाठी ५१७५ लाभार्थींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ग्रामीण विकास यंत्रणेने ४६०४ घरकुलांनाच मंजुरी दिली. यापैकी ९४ टक्के लाभार्थींना पहिला हप्ता, तर ७५ टक्के लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. मंजूर घरकुलांपैकी आजअखेर केवळ २९८२ घरकुले पूर्ण असून, १६२१ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. यापैकी काही लाभार्थींना दोन हप्ते मिळूनही जागा नसल्यामुळे त्यांनी घरकुले बांधली नाहीत. उर्वरित लाभार्थींनी पैसे घेऊनही कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.२०१७-१८ वर्षामध्ये शासनाकडून १८९२ घरकुलांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी आले होते. त्यापैकी १७५५ घरकुलांच्या प्रस्तावास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. ८६ टक्के लाभार्थींना पहिला, तर ३० टक्के लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. मात्र वर्षभरात केवळ २७७ लाभार्थींचीच घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १४७८ म्हणजे ७७ टक्के कामे अपूर्ण आहेत. निधीची उपलब्धता असूनही कामे अपूर्ण राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जागेचा प्रश्न आहे. गावामध्ये एक गुंठा जागा खरेदी करण्यासाठी किमान चार ते पाच लाखांचा खर्च आहे. त्यामुळे जागा खरेदीची कुवत नसल्यामुळे घरकुल मंजूर असूनही ते लाभार्थी बांधू शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासनाने २०१८-१९ मध्येही जिल्ह्यातील ७३० घरकुले मंजूर आहेत. एप्रिल २०१८ पासून आतापर्यंत आठ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे अपूर्णच आहेत.थेट लाभार्थींच्या खात्यावर पैसेराज्य शासनाकडून थेट लाभार्थींच्या खात्यावरच पैसे वर्ग केले जात आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींची यंत्रणा यातून वगळली आहे. घरकुलाचे काम सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यामध्ये लाभार्थींना पैसे दिले जात आहेत. कामाचे प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र काढून आवास सॉफ्टवेअरवर लोड केल्यानंतर लगेच लाभार्थींच्या खात्यावर पैसे वर्ग होत असल्यामुळे भ्रष्टाचारास थाराच नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांनी दिली. अपूर्ण घरकुलांच्या कामांना येत्या दोन महिन्यात गती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री आवास योजनेतील अपूर्ण कामे...तालुका २०१६-१७ २०१७-१८आटपाडी १६७ १९०जत १०८ ५४७कडेगाव ३९ २३क़महांकाळ ८४ ६१खानापूर १०६ ८मिरज ३८५ ३३७तालुका २०१६-१७ २०१७-१८पलूस १५८ ७०शिराळा १२७ ४३तासगाव १३६ ६९वाळवा ३११ १३०एकूण १६२१ १४७८