शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

जिल्ह्यातील ७१०६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो ...

सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. यापैकी केवळ ५० हजार १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख सात हजार रुपयांचे वाटप झाले आहे. अद्याप ७१ हजार ६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झाला. दुष्काळी भागातील ओढे, नद्यांना महापूर आला. हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाहून गेली तर काही पिकांमध्ये सतत पाणी राहिल्यामुळे कुजून गेली. भाजीपाला शेतातच सडला होता. या पिकांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून अहवाल पाठविला होता. त्यानुसार पहिले पंचनामे झालेल्या ५० हजार १७ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २३ कोटी ६० लाख सात हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. ऑक्टोबरमध्ये पुन्हा सर्वेक्षण केल्यानंतर ७१ हजार ६६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पंचनामे करून ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांच्या निधीची मागणी केली होती. राज्य शासनाकडून दोन दिवसापूर्वी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोट

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप झाले आहे. परंतु, अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून शासनाने तातडीने मदतीचे वाटप करण्याची गरज आहे. सध्या रब्बी पिकांना खते, औषध फवारणीसाठी पैशांची गरज आहे.

- अरविंद पाटील, शेतकरी, सोनी, ता. मिरज.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून आलेल्या निधीचे वाटप झाले आहे. उर्वरित ७१ हजार ६६ शेतकरी शिल्लक असून त्यांच्यासाठी ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये मिळाले आहेत. त्याचेही तात्काळ वाटप होणार आहे.

- मौसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.