शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जिल्ह्यातील ७१०६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो ...

सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. यापैकी केवळ ५० हजार १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख सात हजार रुपयांचे वाटप झाले आहे. अद्याप ७१ हजार ६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झाला. दुष्काळी भागातील ओढे, नद्यांना महापूर आला. हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाहून गेली तर काही पिकांमध्ये सतत पाणी राहिल्यामुळे कुजून गेली. भाजीपाला शेतातच सडला होता. या पिकांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून अहवाल पाठविला होता. त्यानुसार पहिले पंचनामे झालेल्या ५० हजार १७ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २३ कोटी ६० लाख सात हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. ऑक्टोबरमध्ये पुन्हा सर्वेक्षण केल्यानंतर ७१ हजार ६६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पंचनामे करून ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांच्या निधीची मागणी केली होती. राज्य शासनाकडून दोन दिवसापूर्वी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोट

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप झाले आहे. परंतु, अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून शासनाने तातडीने मदतीचे वाटप करण्याची गरज आहे. सध्या रब्बी पिकांना खते, औषध फवारणीसाठी पैशांची गरज आहे.

- अरविंद पाटील, शेतकरी, सोनी, ता. मिरज.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून आलेल्या निधीचे वाटप झाले आहे. उर्वरित ७१ हजार ६६ शेतकरी शिल्लक असून त्यांच्यासाठी ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये मिळाले आहेत. त्याचेही तात्काळ वाटप होणार आहे.

- मौसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.