शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ७१०६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:06 IST

सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो ...

सांगली : दुष्काळी तालुक्यांसह जिल्ह्यातील दहा तालुक्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे एक लाख २१ हजार ८३ शेतकऱ्यांच्या पिकांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे. यापैकी केवळ ५० हजार १७ शेतकऱ्यांना दोन कोटी ३६ लाख सात हजार रुपयांचे वाटप झाले आहे. अद्याप ७१ हजार ६६ शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झाला. दुष्काळी भागातील ओढे, नद्यांना महापूर आला. हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाहून गेली तर काही पिकांमध्ये सतत पाणी राहिल्यामुळे कुजून गेली. भाजीपाला शेतातच सडला होता. या पिकांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून अहवाल पाठविला होता. त्यानुसार पहिले पंचनामे झालेल्या ५० हजार १७ शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २३ कोटी ६० लाख सात हजार रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. ऑक्टोबरमध्ये पुन्हा सर्वेक्षण केल्यानंतर ७१ हजार ६६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पंचनामे करून ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांच्या निधीची मागणी केली होती. राज्य शासनाकडून दोन दिवसापूर्वी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये आले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोट

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचे वाटप झाले आहे. परंतु, अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून शासनाने तातडीने मदतीचे वाटप करण्याची गरज आहे. सध्या रब्बी पिकांना खते, औषध फवारणीसाठी पैशांची गरज आहे.

- अरविंद पाटील, शेतकरी, सोनी, ता. मिरज.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून आलेल्या निधीचे वाटप झाले आहे. उर्वरित ७१ हजार ६६ शेतकरी शिल्लक असून त्यांच्यासाठी ४० कोटी २० लाख ३९ हजार ९०० रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी २३ कोटी ६० लाख सहा हजार रुपये मिळाले आहेत. त्याचेही तात्काळ वाटप होणार आहे.

- मौसमी बर्डे, निवासी उपजिल्हाधिकारी, सांगली.