शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

अवकाळीमुळे ७०० कोटींचे नुकसान

By admin | Updated: December 17, 2014 23:57 IST

द्राक्षे, डाळिंबांना सर्वाधिक फटका : जिल्ह्यात महिन्यात बारा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया

अंजर अथणीकर - सांगली -गेल्या शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये १ हजार ३९३ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुमारे दहा हजार ८४१ हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झालेले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यातील द्राक्षे व डाळिंब बागांसह १२ हजार २३४ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. फळबागांसह रब्बी पिकांचे सुमारे सातशे कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस अवकाळी पावसाने विशेषत: तासगाव, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्याला झोडपले. त्यामुळे सर्वाधिक द्राक्ष पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर ज्वारी, गहू, मका, ऊस यांचेही नुकसान झाले. डाळिंब पिकालाही मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने १० हजार ८४१ हेक्टर क्षेत्रामधील पिकांचे नुकसान झाले होते. यामधील ८९७ हेक्टर क्षेत्रातील नुकसान हे ५० टक्क्यापेक्षा अधिक होते. त्यामुळे ८९७ क्षेत्रातीलच नुकसान मदतीसाठी पात्र ठरले होते. अवकाळी पाऊस कवठेमहांकाळ, खानापूर व तासगाव तालुक्याला नुकसानीचा ठरला आहे. या पावसामध्ये एकूण १ हजार ३९३ हेक्टर क्षेत्र बाधीत ठरले आहे. याचे अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नसून, नजर अंदाज सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. यामध्ये रब्बी क्षेत्र ८५३ हेक्टर असून, द्राक्षे १७१, तर डाळिंबाचे क्षेत्र १०६ हेक्टर आहे. मका क्षेत्र ३२, तर उसाचे क्षेत्र २३१ हेक्टर आहे. गेल्या सप्ताहातील नुकसान हे तीन तालुक्यांतील ५६ गावांमध्ये झाले आहे. या गावांमध्ये सोमवारपासून पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल कर्मचारी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या सहकार्याने नुकसानबाधीत क्षेत्राचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. येत्या आठ दिवसात बाधीत क्षेत्राचे निश्चित आकडे येणार आहेत. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. परंतु, गेल्या सप्ताहातील नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर अहवालही राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नोव्हेंबरचा अहवाल शासनाला सादर नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. या महिन्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. त्यामधील ८९७ हेक्टर क्षेत्रामध्ये ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या सप्ताहात झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. त्याचाही अहवाल सादर करण्यात येईल.विसापूरमध्ये ८० मि.मी. पाऊसगेल्या शुक्रवारी आणि शनिवारी विसापूर सर्कलमध्ये ८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे येथील नुकसान हे भरपाईस पात्र आहे. यावेळी इतर तालुक्यात झालेला पाऊस मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे आहे. मिरज : ३, तासगाव : ३८, कवठेमहांकाळ : ६.३, जत : ४.९, खानापूर : १२.६, कडेगाव : १०. गेल्या शुक्रवारी व शनिवारी झालेल्या नुकसानीचे नजरअंदाज सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रत्यक्ष ग्रामसेवक, कृषी सहायक व महसूल कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. येत्या आठ दिवसांत हे पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर निश्चित नुकसानीचा आकडा मिळेल. हा अहवाल त्यानंतर राज्य शासनाकडे सादर करण्यात येईल.- शिरीष जमदाडे, कृषी अधीक्षक, सांगली जिल्हा डिसेंबरमधील नुकसानज्वारी, गहू, हरभरा : ८५३ हेक्टर द्राक्षे :१७१ हेक्टरडाळिंब : १०६ हेक्टरमका : ३२ हेक्टरऊस : २३१ हेक्टरनोव्हेंबरमधील नुकसानद्राक्षे : ८४१४ हेक्टरडाळिंब : २३५६ हेक्टरअन्य पिके : २९.२५ हेक्टर