शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

हृदयशस्त्रक्रियेसाठी ७० बालके मुंबईला रवाना

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम : राज्य शासन सर्व खर्च करणार

सांगली : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७० बालकांवर मुंबईत शुक्रवार, दि. ४ डिसेंबरला मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी बालकांना घेऊन जाणाऱ्या बसेस आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते पूजन करुन रवाना करण्यात आल्या. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या प्रयत्नाने या बालकांना पुन्हा बागडण्याची संधी मिळणार आहे. अंगणवाडी व शाळांतून करण्यात आलेल्या बालकांच्या आरोग्य तपासणीत जिल्ह्यातील ७० बालकांना हृदयरोग असल्याचे निदान स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार असल्याने त्याला खर्चही मोठा येणार होता. अखेर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना याबाबतची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया होण्यासाठी कार्यवाही सुरु केली होती. त्यानुसार राजीव गांधी जीवनदायी योजनेतून काही खर्च घालून उर्वरित रकमेसाठी मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्टला आवाहन करण्यात आले होते. त्यांनीही आवाहनाला प्रतिसाद देत मदतीची तयारी दर्शवली. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी गायकवाड यांनी त्यांच्याशी चर्चा करुन मदतीची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर सर्व बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नेरुळ (नवी मुंबई) येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ५२, तर उर्वरित बालकांवर सुराणा रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, सभापती गजानन कोठावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिद्दीने कामे कराराज्यासह पावसाने यंदा दगा दिल्याने जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. अशा गंभीर परिस्थितीत केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांनी दुष्काळाबाबत जिद्दीने काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार जयंतराव पाटील यांनी गुरुवारी केले.