शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

कारखान्यांकडे ६१ कोटींची थकबाकी

By admin | Updated: July 1, 2016 23:55 IST

बी. जी. पाटील, पंजाबराव पाटील : एफआरपीची रक्कम मिळविण्यासाठी पुणे येथे आंदोलन

  सांगली : सांगली जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांकडे एफआरपीची ६० कोटी ८२ लाखांची थकबाकी असून, ती त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाही. या प्रश्नावर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर खरडा-भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बळिराजा शेतकरी संघटना अध्यक्ष पंजाबराव पाटील व बी. जी. पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कष्टावर त्यांनी खासदारकी आणि आमदारकी मिळविली. शेतकऱ्यांनीच त्यांना मोठे केले. पण त्यांच्याशीच गद्दारी करून स्वत:चे खिसे भरण्याचे या नेत्यांचे उद्योग चांगले नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची वाताहत होत आहे. एफआरपीची रक्कमही अनेक साखर कारखान्यांनी दिली नाही. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला जात नाही, म्हणून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ऊस गळिताला गेल्यापासून साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम किमान महिन्यात दिली पाहिजे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. तरीही जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे दिसून आले. याबद्दल साखर आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता, दि. १५ जून २०१६ पर्यंत बारा साखर कारखान्यांकडे ६० कोटी ८२ लाखांची थकबाकी असल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांचे सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस असून त्यांना मशागतीसाठी पैशाची गरज आहे. शेतकऱ्यांना कारखानदार पैसे देत नसल्यामुळे त्यांची आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. म्हणून आम्ही पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांना आता दिसणार नाहीत. कारण, त्यांना खासदार आणि आमदार ही पदे मिळाली आहेत. शिवाय, आता ते सत्तेत असल्यामुळे त्यांना आम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच दिसणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी शेट्टी व खोत यांना लगावला. खासदार राजू शेट्टी यांनी, मला खासदार होण्यासाठी मदत करा, मी तुम्हाला आमदार होण्यासाठी मदत करतो, अशी सेटलमेंट माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर केली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. (प्रतिनिधी) वसंतदादा कारखान्यावर : जास्तच प्रेम वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ वर्षातील आठ कोटी ८० लाख आणि २०१५-१६ वर्षातील १८ कोटी १४ लाख रूपये शेतकऱ्यांना दिले नाही. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची त्यांच्याबरोबर जेवणावळ जोरात चालू आहे. यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या दिसणार नाहीत. म्हणून आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.