शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांकडे ६१ कोटींची थकबाकी

By admin | Updated: July 1, 2016 23:55 IST

बी. जी. पाटील, पंजाबराव पाटील : एफआरपीची रक्कम मिळविण्यासाठी पुणे येथे आंदोलन

  सांगली : सांगली जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांकडे एफआरपीची ६० कोटी ८२ लाखांची थकबाकी असून, ती त्यांनी शेतकऱ्यांना अद्याप दिलेली नाही. या प्रश्नावर पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर खरडा-भाकरी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बळिराजा शेतकरी संघटना अध्यक्ष पंजाबराव पाटील व बी. जी. पाटील यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कष्टावर त्यांनी खासदारकी आणि आमदारकी मिळविली. शेतकऱ्यांनीच त्यांना मोठे केले. पण त्यांच्याशीच गद्दारी करून स्वत:चे खिसे भरण्याचे या नेत्यांचे उद्योग चांगले नाहीत. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांची वाताहत होत आहे. एफआरपीची रक्कमही अनेक साखर कारखान्यांनी दिली नाही. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला जात नाही, म्हणून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ऊस गळिताला गेल्यापासून साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम किमान महिन्यात दिली पाहिजे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. तरीही जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे दिसून आले. याबद्दल साखर आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता, दि. १५ जून २०१६ पर्यंत बारा साखर कारखान्यांकडे ६० कोटी ८२ लाखांची थकबाकी असल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांचे सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस असून त्यांना मशागतीसाठी पैशाची गरज आहे. शेतकऱ्यांना कारखानदार पैसे देत नसल्यामुळे त्यांची आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. म्हणून आम्ही पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांना आता दिसणार नाहीत. कारण, त्यांना खासदार आणि आमदार ही पदे मिळाली आहेत. शिवाय, आता ते सत्तेत असल्यामुळे त्यांना आम्हा शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच दिसणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी शेट्टी व खोत यांना लगावला. खासदार राजू शेट्टी यांनी, मला खासदार होण्यासाठी मदत करा, मी तुम्हाला आमदार होण्यासाठी मदत करतो, अशी सेटलमेंट माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर केली आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. (प्रतिनिधी) वसंतदादा कारखान्यावर : जास्तच प्रेम वसंतदादा कारखान्याने २०१३-१४ वर्षातील आठ कोटी ८० लाख आणि २०१५-१६ वर्षातील १८ कोटी १४ लाख रूपये शेतकऱ्यांना दिले नाही. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची त्यांच्याबरोबर जेवणावळ जोरात चालू आहे. यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या दिसणार नाहीत. म्हणून आम्हीच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.