शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ६00 बेशिस्त वाहनधारकांना ह्यई-चलनह्णचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 13:02 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहर परिसरातील सातशे बेशिस्त वाहनधारकांना ई-चलनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा घरी पाठविण्यात आल्या आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वादावादीला पूर्णविराम मिळाला आहे. वाहतूक नियम तोडूनही दंड भरण्यास नकार देणाºयांना ही नोटीस भारी पडत आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची नोटीस थेट घरी मिळत असल्याने वाहनधारक दंड भरण्यास स्वत: वाहतूक शाखेत हजेरी लावत आहेत.

ठळक मुद्देनोटिसा घरपोच : खटल्याच्या धास्तीने वाहनधारक नमलेदीड लाख रुपयांचा दंड वसूलकारवाईची तीव्रता वाढणार...सीसीटीव्ही, सिग्नल बसणार!

सचिन लाड 

सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहर परिसरातील सातशे बेशिस्त वाहनधारकांना ई-चलनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा घरी पाठविण्यात आल्या आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वादावादीला पूर्णविराम मिळाला आहे. वाहतूक नियम तोडूनही दंड भरण्यास नकार देणाºयांना ही नोटीस भारी पडत आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची नोटीस थेटघरी मिळत असल्याने वाहनधारक दंड भरण्यास स्वत: वाहतूक शाखेत हजेरी लावत आहेत.

ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीटबेल्ट न घालणे, नियमबाह्य नंबर प्लेट, कर्कश हॉर्न, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, लायसन्स नसणे,हेल्मेट न घालणे यासह इतर वाहतूक नियम वाहनधारकांकडून मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. आपण नियम तोडलाच नाही, असे ठणकावून सांगतात. अनेक राजकीय नेत्यांचे वजन वापरुन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. याला आळा घालण्यासाठी महिन्यापूर्वी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी वाहतूक शाखेत ई-चलन प्रणाली सुरूकेली आहे. या माध्यमातून वाहतूक नियम तोडणाºया वाहनधारकांचे फोटो वाहतूक पोलिस मोबाईलवर घेत आहेत.

फोटो घेतल्यानंतर वाहनाच्या क्रमांकावरून मालकाचे नाव व पत्ता समजतो. तसे सॉफ्टवेअर प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलवर घेण्यात आले आहे. वाहनधारकाचे नाव, पत्ता समजल्यानंतर त्याला घरी नोटीस पाठवून सात दिवसांत वाहतूक शाखेत दंड भरावा, अन्यथा खटला दाखल केला जाईल, असा इशारा दिला जातो.

मोबाईलवर घेतलेल्या फोटोत संबंधित वाहनधारकाचे वाहन, त्याने कोणत्या प्रकारचा नियम तोडला आहे, याचे चित्रण, वेळ, ठिकाण येत आहे. या सर्व बाबींचा उल्लेख नोटिशीत असतो. त्यामुळे वाहनधारकांना खोटे बोलण्याची संधी मिळत नाही. ह्यई-चलनह्ण असे या कार्यप्रणालीस नाव देऊन गेल्या महिन्यापासून कारवाई सुरू ठेवली आहे. दंड किती वसूल झाला, यापेक्षा आपण चुकलो असतानाहीपोलिसांशी वाद घातला, हे घरी नोटीस आल्यानंतर वाहनधारकांना समजत आहे.

सीसीटीव्ही, सिग्नल बसणार!शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राजवाडा चौक, पुष्पराज चौक, आझाद चौक, सिव्हिल चौक येथे सिग्नल बसविण्यात आले आहेत. कॉलेज कॉर्नर, आमराई आदी गर्दीच्या चौकात सिग्नल बसविण्याचे नियोजन सुरु आहे. ह्यई-चलनह्ण प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी व गुन्ह्यांची उकल, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पोलिसांना निधी मिळणार आहे.

दंड किती वसूल झाला, यापेक्षाही वाहनधारकांना वाहतूक नियम व शिस्त लागली पाहिजे. दंडात्मक कारवाईचा बडगा उगारताना अनेकदा वादाचे प्रकार आजही घडतात. ई-चलनमुळे मी चूक केली नाही, मग दंड का भरू, असे वाहनधारकांना आताम्हणता येत नाही. दंड जरी भरण्यास नकार दिला तरी, त्याच्याकडून ई-चलनच्या माध्यमातून वसूल करता येत नाही. या प्रणालीचा आणखी प्रभावीपणे वापर केला जाईल.- अतुल निकम,सहाय्यक पोलिस निरीक्षक,वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.