शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

जिल्हा बँकेकडील कर्ज थकबाकी ५१२ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : काही कारखान्यांची थकीत ऊस बिले, लॉकडाऊनमुळे बाजारावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींचा परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ हजारांवर सभासदांकडील ५१२ कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असून, थकबाकी वाढल्याने त्याचा कर्जवाटपावर परिणाम झाला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अनेक संकटातही बँकेने नफ्याची परंपरा कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात या बँकेला कर्ज वसुलीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. काही मोजक्याच साखर कारखान्यांनी ऊसाची बिले शेतकऱ्यांना न दिल्याने शेतकऱ्यांकडून कर्जाचा भरणा होऊ शकला नाही. त्यामुळे थकबाकीत भर पडली आहे. बिले मिळाल्यानंतर वसुलीला गती मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे कर्जाची थकबाकी वाढल्याने त्याचा नव्या कर्ज वाटपावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्जवाटप होऊ शकले आहे. कर्जवाटपातही दरवर्षी बँक आघाडीवर असते. यंदा थकबाकी असल्याने अडचणी येत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ५,३५६ कोटी ८४ लाख रुपये कर्जाचे वाटप केले होते. यंदाही कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कर्जवसुली महत्त्वाची आहे.

चालू आर्थिक वर्षाचा पहिला तिमाही संपला आहे. पुढील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चांगली कर्जवसुली करण्यासाठी बँकेने नियोजन केले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे.

चौकट

दोन लाखांवरील थकबाकी १०० कोटींची

जिल्ह्यातील २ लाखांवरील कर्ज असलेल्या ८ हजार ७१३ सभासदांची थकबाकी १०० कोटींच्या घरात आहे. एकूण थकबाकीचा विचार केल्यास ४३ हजार सभासद थकबाकीत असून, त्यांची थकबाकी ५१२ कोटी रुपयांची आहे.

कोट

जिल्हा बँकेने वसुलीसाठी प्रयत्न चालवले आहेत. वसुलीला मोठ्या अडचणी नाहीत, पण थकबाकीचा परिणाम कर्जवाटपावर झाला आहे. सध्या ५० टक्के कर्जवाटप झाले आहेत. येत्या तिमाहीत चांगली वसुली व कर्जवाटप होण्याची आशा आहे.

- जयवंत कडू-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक