शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

जिल्ह्यातील ५०० टन भाजीपाला शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST

सांगली : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोरला जाणाऱ्या ९०० टन भाजीपाल्यापैकी सध्या ४०० टनच जात आहे. उर्वरित ...

सांगली : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोरला जाणाऱ्या ९०० टन भाजीपाल्यापैकी सध्या ४०० टनच जात आहे. उर्वरित ५०० टन भाजीपाला शेतातच पडून आहे. यामुळे उत्पादकांना दररोज ८० लाखांचा फटका बसत आहे.

जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. रोज ९०० टन भाजीपाला बाहेरच्या बाजारात पाठविला जातो. स्थानिक बाजारात हजारो टन रोज विक्री होत होती. मात्र सध्या कसाबसा ४०० टन भाजीपाला मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर येथे जात आहे. तुंग, समडोळी (ता. मिरज) येथून रत्नागिरीला चाळीस टन भाजीपाला जात होता. तोही बंद आहे. दर ७० टक्क्यांनी उतरले आहेत. किलोला ३५ रुपये असणारी ढबू मिरची सहा रुपयांवर आली आहे. कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका, दुधी भोपळा, भेंडीला घाऊक बाजारात पाच ते दहा रुपये दर मिळत आहे. भाजी विक्रेते मात्र घरोघरी जाऊन ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत, असे उत्पादक मनोज गाजी यांनी सांगितले.

चौकट

भाजीपाल्याचे घाऊक दर

सध्या लॉकडाऊनपूर्वी

ढबू मिरची : ६ रुपये ३५ रुपये

वांगी : ८ ३०

हिरवी मिरची : ५ २५

कोबी : ५ १५

प्लॉवर : ४ २०

दोडका : ८ ३५

दुधी भोपळा : ८ २०