शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

मिरज पूर्व भागातून दररोज ५० टन केळीची निर्यात

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

रोपांची वाढती मागणी : अडीचशे एकरात केळीची लागवड

टाकळी : मिरज पूर्व भागातील शेतकरी खर्च कमी व उत्पादन जास्त देणाऱ्या पिकांकडे वळत आहे. ऊस उत्पादन घेणारा शेतकरी केळी उत्पादनाकडे वळला असून मिरज पूर्व भागामध्ये २५० एकर क्षेत्रातात लागवड झाली आहे. दररोज ५० टन केळीची निर्यात केली जात आहे.पूर्व भागातील शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षशेतीकडे मोठ्याप्रमाणात वळले. पण द्राक्ष उत्पादन खर्च व मिळणारा भाव यात तफावत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. द्राक्षशेतीपेक्षा केळी उत्पादन शेतकऱ्यांना फायद्याचे होत असल्याने पूर्व भागातील एरंडोली, सलगरे, बेळंकी, मल्लेवाडी, आरग, बेडग, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांचा केळी उत्पादनाकडे कल वाढला आहे. पूर्व भागात सुमारे २५० एकर क्षेत्रामध्ये केळी उत्पादन घेतले जात आहे. पूर्व भागातून दररोज ५० टन केळी निर्यात केली जात आहे. स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना टनास १२ ते १४ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॉक्स पॅकिंग व वाहतुकीचाही खर्च वाचत आहे. एक वर्षात एकरी ३५ ते ४० टन केळीचे उत्पन्न शेतकरी काढत आहेत. द्राक्षशेतीच्या तुलनेत उत्पादन खर्चही कमी असल्याने केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बोलवाड येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांनी पाच एकर केळी बाग लावली आहे. त्यांनी एकरी ३५ ते ३७ टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेमुळे ढबू, टोमॅटो तसेच ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर होता. औषध व मजुरांचा खर्च अत्यल्प असल्याने केळी उत्पादनाला शेतकरी महत्त्व देऊ लागला आहे. पूर्व भागात द्राक्ष, ऊस उत्पादनाची जागा केळीच्या बागा घेऊ लागल्याचे चित्र आहे. सुशिक्षत तरूणांचा केळीच्या शेतीकडे सर्वाधिक कल आहे. (वार्ताहर)रोपांचा तुटवडाजळगाव येथून केळीची रोपे आयात केली जातात. एक रोप परिपूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून रोपांना वाढती मागणी आहे. रोपांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्यासाठी रोपांची मागणी नोंदवली आहे, असे मत बोलवाडचे रोपे विक्रेते रवींद्र पाटील यांनी सांगितले.