शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्व भागातून दररोज ५० टन केळीची निर्यात

By admin | Updated: December 11, 2014 23:41 IST

रोपांची वाढती मागणी : अडीचशे एकरात केळीची लागवड

टाकळी : मिरज पूर्व भागातील शेतकरी खर्च कमी व उत्पादन जास्त देणाऱ्या पिकांकडे वळत आहे. ऊस उत्पादन घेणारा शेतकरी केळी उत्पादनाकडे वळला असून मिरज पूर्व भागामध्ये २५० एकर क्षेत्रातात लागवड झाली आहे. दररोज ५० टन केळीची निर्यात केली जात आहे.पूर्व भागातील शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षशेतीकडे मोठ्याप्रमाणात वळले. पण द्राक्ष उत्पादन खर्च व मिळणारा भाव यात तफावत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. द्राक्षशेतीपेक्षा केळी उत्पादन शेतकऱ्यांना फायद्याचे होत असल्याने पूर्व भागातील एरंडोली, सलगरे, बेळंकी, मल्लेवाडी, आरग, बेडग, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांचा केळी उत्पादनाकडे कल वाढला आहे. पूर्व भागात सुमारे २५० एकर क्षेत्रामध्ये केळी उत्पादन घेतले जात आहे. पूर्व भागातून दररोज ५० टन केळी निर्यात केली जात आहे. स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना टनास १२ ते १४ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॉक्स पॅकिंग व वाहतुकीचाही खर्च वाचत आहे. एक वर्षात एकरी ३५ ते ४० टन केळीचे उत्पन्न शेतकरी काढत आहेत. द्राक्षशेतीच्या तुलनेत उत्पादन खर्चही कमी असल्याने केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बोलवाड येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांनी पाच एकर केळी बाग लावली आहे. त्यांनी एकरी ३५ ते ३७ टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेमुळे ढबू, टोमॅटो तसेच ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर होता. औषध व मजुरांचा खर्च अत्यल्प असल्याने केळी उत्पादनाला शेतकरी महत्त्व देऊ लागला आहे. पूर्व भागात द्राक्ष, ऊस उत्पादनाची जागा केळीच्या बागा घेऊ लागल्याचे चित्र आहे. सुशिक्षत तरूणांचा केळीच्या शेतीकडे सर्वाधिक कल आहे. (वार्ताहर)रोपांचा तुटवडाजळगाव येथून केळीची रोपे आयात केली जातात. एक रोप परिपूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून रोपांना वाढती मागणी आहे. रोपांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्यासाठी रोपांची मागणी नोंदवली आहे, असे मत बोलवाडचे रोपे विक्रेते रवींद्र पाटील यांनी सांगितले.