शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

बालगंधर्व स्मारकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर

By admin | Updated: July 26, 2015 00:17 IST

‘लोकमत’ इफेक्ट : नागठाण्यातील रखडलेल्या बांधकामास मिळणार गती

सांगली : नागठाणे (ता. पलूस) येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ५० लाखांचा निधी शनिवारी मंजूर केला. चालू वर्षात कोणत्याही परिस्थितीत हा निधी खर्च करण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. मराठी संगीत रंगभूमीला तेजोवलय प्राप्त करून देणाऱ्या बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आयुष्यात ज्यापद्धतीने संघर्ष वाट्याला आला, त्याचपद्धतीचा संघर्ष त्यांच्या जन्मगावी असलेल्या स्मारकाच्या वाट्याला आला आहे. बालगंधर्वांच्या पावलांनी रंगभूमी पावन झाल्याच्या गोष्टीला ११० वर्षे उलटली तरी, त्यांच्याच जन्मगावी त्यांच्या नावाचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. राजकीय नेत्यांची अनेक भव्य स्मारके राज्यभरात उभारली जात असताना, रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविणाऱ्या या महान कलाकाराच्या स्मारकाला आणि नाट्यगृहाला शासनाच्या निधीसाठी ताटकळत रहावे लागत आहे. ‘लोकमत’ने १५ जुलैरोजी बालगंधर्वांच्या स्मृतिदिनी या गोष्टीवर प्रकाशझोत टाकला होता. मतदारसंघातील आ. पतंगराव कदम यांनीही या गोष्टीची दखल घेत शासनाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने याची दखल घेत आता तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर केला होता. स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न २००५ पासून प्रलंबित आहे. जागेचा वाद मिटल्यानंतर नागठाणेच्या स्मारक उभारणीच्या कामास १७ फेब्रुवारी २००९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी ४६ लाखांच्या कामास त्यावेळी मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळाल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू होण्यासाठी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. १६ आॅक्टोबर २०१२ रोजी बांधकामास सुरुवात झाली. ४२ लाख ६० हजार रुपयांचे पाईल्स व पिलरचे काम झाल्यानंतर काम पुन्हा थांबले. आता शासनाच्या निधीसाठी प्रशासकीय पाठपुरावा सुरू आहे. स्मारकासाठी झालेल्या बैठकीलाही आता वर्ष उलटले आहे. निधीसाठी अनेकदा शासनाचे उंबरे झिजविण्यात आले. शासनाने ५० लाखांचा निधी चालूवर्षी तातडीने खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकामाचा हा निधी असला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग न करता संबंधित तहसीलदारांकडे देऊन तो खर्च करावा. तहसीलदारांना यासाठी संवितरण अधिकारी म्हणू नेमावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे बालगंधर्वांच्या स्मारकाचे रखडलेले काम आता मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)