शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दुष्काळी भागातील ५0% तलाव भरले

By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST

दिलासादायी चित्र : जिल्ह्यातील १७ तलाव तुडुंब

अंजर अथणीकर - सांगली -सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला यंदा पावसाने दिलासा दिल्याचे चित्र आहे. दुष्काळी आटपाडी, खानापूर या दोन तालुक्यातील तलाव निम्म्याहून अधिक भरले आहेत. जिल्ह्यात एकूण ८३ तलाव असून, यापैकी १६ तलावांमध्ये क्षमतेच्या ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक पाणीसाठा असून, हा साठा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वच टँकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जुलै महिन्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा होता. आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा साठा आता ४० टक्क्याहून अधिक झाला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ८३ तलावांपैकी १७ तलाव पूणपणे भरले आहेत. त्याचबरोबर १६ तलावांमध्ये ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ८३ तलावांची पाणी क्षमता ९ हजार ३९८.७५ दश लक्ष घनफूट असून, आज त्यामध्ये ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट पाणी आहे. यामध्ये आणखीन वाढ होत आहे. खानापूर तालुक्यातील १, कडेगाव तालुक्यातील ५, शिराळा तालुक्यातील ५, आटपाडी तालुक्यातील २, मिरज तालुक्यातील १ व वाळवा तालुक्यातील १ तलाव शंभर टक्के भरला आहे. शनिवारी एकूण पाणीसाठा ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट इतका नोंदला गेला आहे. गतवर्षी यावेळी हा पाणीसाठा २ हजार १५.३२ दशलक्ष घनफूट होता. गतवर्षी आॅगस्टच्या अखेरीस २१ टक्के पाणीसाठा तलावामध्ये होता, तो आता ४० टक्के झाला आहे. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये १५३ सिमेंट बंधारे बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, यासाठी २३ कोटी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामधील सर्व बंधाऱ्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामधील १२९ बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन यामधील ४८ बंधाऱ्यांची पाया खुदाईही पूर्ण करण्यात आली आहे. ३१ बंधाऱ्यांची कामे आता पूर्णत्वाकडे आहेत. जिल्ह्यातील १५३ बंधारे पूर्ण झाल्यास त्यामध्ये ६ हजार ३३ घनमीटर पाणीसाठा राहणार आहे. तालुकातलाव साठाटक्केतासगाव ७२१५.८५३०खानापूर८२४६.४८३७कडेगाव६५५६.६८७८शिराळा५१०७१.५५१००आटपाडी१३५२७.३०३९जत२८६०९.१५१६क.महांकाळ११३४३.४५३६मिरज३१००.८५७१वाळवा२३८.८७७५एकूण ८३३७१०४०टंचाईवर ७ कोटीपाणी टंचाई निवारणासाठी ८ कोटी ११ लाखाांचे अनुदान प्राप्त झाले असून, यामधील ७ कोटी ४१ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. उपसा सिंचनाच्या आॅगस्टअखेर वीज बिल भरण्यासाठी ६ कोटींची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून राज्य शासनाला नुकताच पाठविण्यात आला आहे.