शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दुष्काळी भागातील ५0% तलाव भरले

By admin | Updated: September 9, 2014 23:43 IST

दिलासादायी चित्र : जिल्ह्यातील १७ तलाव तुडुंब

अंजर अथणीकर - सांगली -सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला यंदा पावसाने दिलासा दिल्याचे चित्र आहे. दुष्काळी आटपाडी, खानापूर या दोन तालुक्यातील तलाव निम्म्याहून अधिक भरले आहेत. जिल्ह्यात एकूण ८३ तलाव असून, यापैकी १६ तलावांमध्ये क्षमतेच्या ७५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. आज (शनिवार) जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक पाणीसाठा असून, हा साठा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. आॅगस्टमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्वच टँकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात जुलै महिन्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा होता. आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा साठा आता ४० टक्क्याहून अधिक झाला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ८३ तलावांपैकी १७ तलाव पूणपणे भरले आहेत. त्याचबरोबर १६ तलावांमध्ये ७० टक्क्याहून अधिक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ८३ तलावांची पाणी क्षमता ९ हजार ३९८.७५ दश लक्ष घनफूट असून, आज त्यामध्ये ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट पाणी आहे. यामध्ये आणखीन वाढ होत आहे. खानापूर तालुक्यातील १, कडेगाव तालुक्यातील ५, शिराळा तालुक्यातील ५, आटपाडी तालुक्यातील २, मिरज तालुक्यातील १ व वाळवा तालुक्यातील १ तलाव शंभर टक्के भरला आहे. शनिवारी एकूण पाणीसाठा ३ हजार ७१०.१८ दशलक्ष घनफूट इतका नोंदला गेला आहे. गतवर्षी यावेळी हा पाणीसाठा २ हजार १५.३२ दशलक्ष घनफूट होता. गतवर्षी आॅगस्टच्या अखेरीस २१ टक्के पाणीसाठा तलावामध्ये होता, तो आता ४० टक्के झाला आहे. जिल्ह्यात आॅगस्टमध्ये १५३ सिमेंट बंधारे बांधण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, यासाठी २३ कोटी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामधील सर्व बंधाऱ्यांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर यामधील १२९ बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन यामधील ४८ बंधाऱ्यांची पाया खुदाईही पूर्ण करण्यात आली आहे. ३१ बंधाऱ्यांची कामे आता पूर्णत्वाकडे आहेत. जिल्ह्यातील १५३ बंधारे पूर्ण झाल्यास त्यामध्ये ६ हजार ३३ घनमीटर पाणीसाठा राहणार आहे. तालुकातलाव साठाटक्केतासगाव ७२१५.८५३०खानापूर८२४६.४८३७कडेगाव६५५६.६८७८शिराळा५१०७१.५५१००आटपाडी१३५२७.३०३९जत२८६०९.१५१६क.महांकाळ११३४३.४५३६मिरज३१००.८५७१वाळवा२३८.८७७५एकूण ८३३७१०४०टंचाईवर ७ कोटीपाणी टंचाई निवारणासाठी ८ कोटी ११ लाखाांचे अनुदान प्राप्त झाले असून, यामधील ७ कोटी ४१ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले आहेत. उपसा सिंचनाच्या आॅगस्टअखेर वीज बिल भरण्यासाठी ६ कोटींची आवश्यकता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून राज्य शासनाला नुकताच पाठविण्यात आला आहे.