शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागातील ४८ गावे पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील येत्या पंचवीस वर्षातील लोकसंख्यावाढ विचारात घेऊन ‘जल जीवन मिशन’ ...

इस्लामपूर : शिराळा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वाळवा तालुक्यातील ४८ गावातील येत्या पंचवीस वर्षातील लोकसंख्यावाढ विचारात घेऊन ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी देण्याबाबतचे आराखडे तयार करावेत, अशी सूचना आ. मानसिंगराव नाईक यांनी केली.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘जल जीवन मिशन’ योजनेबाबत बैठक झाली. बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, तालुक्याच्या सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.

आ. नाईक म्हणाले, जल जीवन मिशन हे प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याबाबत सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे. यामध्ये बंद पडलेल्या, रखडलेल्या, पाण्याची कमतरता असलेल्या किंवा नव्याने मागणी असलेल्या योजना पूर्ण करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यापासून गावे स्वयंपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी आगामी पंचवीस वर्षातील अपेक्षित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन पाणी योजनांचे आराखडे तयार करावे. या कामात कोणीही हायगय करू नये.

सहायक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सदस्य शंकरराव चव्हाण, बाजार समितीचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, शाखा अभियंता राजेंद्र कांबळे उपस्थित होते. शाखा अभियंता प्रवीण तेली यांनी आभार मानले.

फोटो - ०१०२२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर पाणी न्यूज

इस्लामपूर (ता.वाळवा) येथील पंचायत समितीमध्ये झालेल्या ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या बैठकीत आ. मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देवराज पाटील, शुभांगी पाटील, नेताजी पाटील, शशिकांत शिंदे, अजिंक्य कुंभार उपस्थित होते.