शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

निवडणुकीपूर्वीच ४५० जण बाद!

By admin | Updated: November 2, 2016 23:57 IST

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक : ९५८ जणांचे अर्ज झाले वैध

 सांगली : जिल्ह्यातील पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींमध्ये एकूण १७९ जागांसाठी एक हजार ४०८ उमेदवारी अर्ज दाखल होते. बुधवारी अर्ज छाननीमध्ये ४५० अर्ज अवैध ठरले असून, ९५८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. शिराळा नगरपंचायतीसाठी एकही अर्ज आला नव्हता. काही दिग्गज उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वीच मैदानातून बाहेर रहावे लागणार आहे. उर्वरित वैध उमेदवारांपैकी कितीजण मैदानात राहणार, हे दि. ११ नोव्हेंबर रोजीच ठरणार आहे. इस्लामपूर नगरपालिकेसाठी १९७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ५९ अर्ज अवैध ठरले असून, १३८ अर्ज वैध ठरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११ उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले. राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील, विकास आघाडीचे निशिकांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे विश्वास सायनाकर यांच्यासह इतर ८ उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. विटा नगरपारिषदेत नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेसमधून जयश्रीताई पाटील व त्यांच्या स्नुषा प्रतिभा पाटील यांचे अर्ज दाखल होते. परंतु, प्रतिभा पाटील यांच्या अर्जाला पक्षाचा एबी फॉर्म जोडण्यात आल्याने जयश्रीताई पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शिवसेनेतून आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल अमोल बाबर व सविता तानाजी जाधव यांचे अर्ज होते. यावेळी सविता जाधव यांच्या अर्जाला शिवसेनेचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध झाला, तर रासपमधून पूजा तारळेकर यांचा अर्ज वैध ठरला आहे. येथे एकूण १९७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ९९ अवैध ठरले असून, ९८ अर्ज वैध झाले आहेत. आष्टा नगरपालिकेसाठी एकूण १५५ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सात अर्ज अवैध झाले असून, १४ वैध राहिले आहेत. स्मिता धनवडे व विशाल शिंदे यांच्याविरुद्ध उमेदवार बाद झाल्याने याठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार का, याकडे लक्ष लागले आहे. लोकशाही आघाडीचे उमेदवार बाद झाल्याने सेनेचे वीर कुदळे यांनी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एकूण १२६ उमेदवारी अर्जांपैकी ४७ उमेदवारी अर्ज अवैध झाले. यामधील बहुतांशी अर्ज पक्षांचे अधिकृत फॉर्म न जोडल्योमुळे अवैध करण्यात आले. तर दोन उमेदवारी अर्ज इतर कारणांनी अवैध झाले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष बोरकर यांनी दिली. पलूस नगरपालिकेच्या १७ जागांसाठी १७७ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये ५८ अर्ज बाद झाले असून, ११९ उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. कडेगाव नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १५५ अर्ज दाखल झाले होते. ६८ अर्ज अवैध झाले असून, ८७ अर्ज वैध राहिले आहेत. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी १८६ अर्ज राहिले होते. त्यापैकी केवळ पाच अर्ज अवैध ठरले असून, उर्वरित १८१ अर्ज वैध राहिले आहेत. यामुळे येथील निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. (प्रतिनिधी) तासगावमध्ये हरकती फेटाळल्या तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठीचे २० अर्ज अवैध ठरले, तर १३ अर्ज कायम राहिले. नगरसेवकपदासाठी दाखल २१५ अर्जापैकी १०७ अर्ज अवैध, तर १०८ अर्ज वैध ठरले. राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांविरोधात भाजपने घेतलेला आक्षेप फेटाळण्यात आला. भाजपचे प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार दत्तात्रय रेंदाळकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपचे उमेदवार सचिन माळी यांनी राष्ट्रवादीच्या रेहाना मुल्ला यांच्या अर्जाबाबत हरकत घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दोन्ही हरकती फेटाळण्यात आल्या. याची दिवसभर चर्चा होती.