शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तंबाखूजन्य पदार्थांची ४.५० कोटींची उलाढाल

By admin | Updated: May 31, 2014 00:44 IST

सांगली जिल्ह्यातील चित्र : तरुणांमध्ये सिगारेट ओढण्याचे वाढते प्रमाण चिंताजनक

नरेंद्र रानडे ल्ल सांगली तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगाला निमंत्रण मिळत असले तरी, जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या जाळ्यात गुरफटली आहे. सांगली जिल्ह्यात महिन्याला तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या सिगारेटस् आणि तंबाखूची विक्री होत असून शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, मावा, सुगंधी तंबाखू आदी तंबाखूजन्य पदार्थांची सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मागील काही महिन्यांपासून तंबाखूपेक्षा युवक वर्ग सिगारेटलाच पसंती देत आहे. भविष्यकाळात तंबाखूजन्य पदार्थांच्या जंजाळातून युवक वर्गाला बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी हातात हात घालून जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे. भारतात तंबाखूचे आगमन सोळाव्या शतकात झाले. कोलंबसने अमेरिकेहून तंबाखू नामक वनस्पती भारतात आणली. यामध्ये अनेक विषारी पदार्थ असल्यामुळे तंबाखू सेवन आरोग्यास धोकादायक असते. तंबाखूचा पहिला बळी लिस्बनचा भारतातील राजदूत जॉन निकोट याचा गेला. त्यामुळेच तंबाखूमधील सर्वात विषारी द्रव्याला ‘निकोटिन’ हे नाव देण्यात आले. त्याकाळी केवळ तंबाखू हा एकमेव पदार्थ उपलब्ध होता. कालांतराने तंबाखूजन्य पदार्थांमध्ये वाढ होत गेली. यामध्ये विडी, सिगारेट, जर्दा, गुटखा, मशेरी, तपकीर, हुक्का पाईप, तंबाखूची पेस्ट यांचा समावेश होतो. वास्तविक तंबाखू ही वनस्पती कोणतेही जनावर खात नाही. परंतु आरोग्याचे अपरिमित नुकसान होते हे माहिती असूनही अनेकजण तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगात सुमारे ५० लाखांहून अधिक लोक तंबाखूच्या व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखूच्या व्यसनांमुळे पाचक रसांचे प्रमाण घटते, रक्तवाहिन्यांचा संकोच होतो, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, तोंडाचा कॅन्सर होतो. म्हणजेच तंबाखू सेवन करून आपण आपल्याच शरीराची हानी करीत असतो. बदलत चाललेली सामाजिक परिस्थिती, विद्यार्थ्यांसमोर असलेली नको ती आदर्श व्यक्तिमत्त्वे, ऐषोरामात जगण्याची लागलेली सवय, वाढती गरिबी यामुळे अनेकजण व्यसनांना जवळ करतात, परंतु तेच व्यसन त्यांचा जीव घेते. शासनाने केवळ कायदे करून काहीही उपयोग होणार नाही, तर लोकांची मानसिकता बदलणे हे मोठे आव्हान आहे. सरकारने २००३ मध्ये गुटखाबंदीचे खंबीर पाऊल उचलले असले तरीही, सर्रास गुटखा उपलब्ध होतो. सांगली जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने छापे मारून आतापर्यंत कोट्यवधीचा गुटखा जप्त केला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या खपाला आळा घालायचा असेल, तर लोकशिक्षणाची गरज आहे. त्याचप्रमाणे शासनाने तंबाखूजन्य पदार्थांवर जास्त कर आकारणी केली, तर काही प्रमाणात त्यांचा खप कमी होईल.