शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

पोलीस ‘हिटलिस्ट’वर जिल्ह्यातील ४५० गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:00 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये, यासाठी पोलीस यंत्रणेने कारवाईच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. रेकॉर्डवरील ४५० गुन्हेगारांची यादी बनवून त्यांना कारवाईच्या ‘हिटलिस्ट’वर ठेवले आहे. त्यांच्याविरुध्द तडीपार व स्थानबध्दता करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. अवैध व्यावसायिकांनाही ‘टार्गेट’ केले आहे.पालिकेच्या ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये, यासाठी पोलीस यंत्रणेने कारवाईच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. रेकॉर्डवरील ४५० गुन्हेगारांची यादी बनवून त्यांना कारवाईच्या ‘हिटलिस्ट’वर ठेवले आहे. त्यांच्याविरुध्द तडीपार व स्थानबध्दता करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. अवैध व्यावसायिकांनाही ‘टार्गेट’ केले आहे.पालिकेच्या निवडणुकीसाठी सांगली, मिरज व कुपवाड या तीनही शहरात १ आॅगस्टला मतदान होत आहे. तीनही शहरांचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. लोकसंंख्या वाढली असली तरी त्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. अनेक प्रभाग संवेदनशील आहेत. उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ कारणांवरून वादाचे प्रकार घडू शकतात. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईचे चांगल्याप्रकारे नियोजन केले आहे. त्याची सुरुवात आचारसंहिता लागू झाल्यापासून केली आहे. पहिल्या टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅलआऊट’ मोहीम राबवून विविध प्रकारच्या अडीचशेहून अधिक कारवाया केल्या. अवैध व्यावसायिकांनी बस्तान बसवू नये, यासाठी त्यांना ‘टार्गेट’ केले आहे.गुन्हेगारांची यादी बनविण्याचे आदेशगुन्हेगारीत सक्रिय असलेल्या व नसलेल्या गुन्हेगारांची यादी बनविण्याचे आदेश शर्मा यांनी दिले आहेत. त्यानुसार सांगली शहर, संजयनगर, विश्रामबाग, कुपवाड, मिरज शहर व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कामाला लागले आहेत. तडीपार केलेल्या गुन्हेगारांनी पुन्हा सांगलीत येऊ नये, यासाठी त्यांच्या घरावर ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सहा तडीपार गुन्हेगारांना पकडून पुन्हा जिल्ह्याबाहेर सोडले आहे. ग्रामीण भागातील गुन्हेगार उमेदवारांच्या समर्थनार्थ शहरात येऊ नयेत, यासाठी त्यांच्याविरुध्दही कारवाईचे नियोजन केले आहे.हॉटेल, ढाब्यांवर नजरनिवडणुकीची रणधुमाळी सुरूझाल्याने रात्रीच्या जेवणावेळी सुरू झाल्या आहेत. शहर व परिसरातील हॉटेल, दारूची दुकाने व ढाब्यावर गर्दी वाढली आहे. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी हॉटेल, ढाबे व दारू दुकानमालकांना रात्री अकरानंतर दुकाने बंद करण्याची सूचना केली आहे. पान दुकाने तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही साडेदहानंतर व्यवसाय बंद झाला पाहिजे, असा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अकरा व्यावसायिकांविरुद्ध आतापर्यंत कारवाई केली आहे.सीसीटीव्हीची मदतनिवडणुकीच्यानिमित्ताने नोटा व अवैध शस्त्रांची तस्करी होऊ नये, यासाठी दररोज रात्री नाकाबंदी केली जात आहे. रात्री अकरानंतर संशयित वाहने थांबवून त्यांची तपासणी केली जात आहे. वाहनाचा क्रमांक, चालकाच्या नावाची नोंद करून घेतली जात आहे. यासाठी तीनही शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत घेतली जात आहे.