शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
4
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
5
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
8
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
9
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
10
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
11
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
12
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
13
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
14
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
15
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
16
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
17
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
18
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
19
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
20
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

जिल्ह्यातील ४४० पोलिसांच्या बदल्या!

By admin | Updated: June 3, 2015 01:01 IST

अखेर गॅझेट फुटले : मुलाखती नाहीत; अर्जावरून पार पडली प्रक्रिया

सांगली : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेले जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ अखेर सोमवारी फुटले. एकाही कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून न घेता बदल्या करण्यात आल्या आहेत. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी बदलीच्या कक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून घेतले होते. मात्र त्यांची बदली झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. याच अर्जांच्या आधारे सोमवारी काही तासातच ४४० कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या. पोलीस ठाण्यात पाच वर्षे व विभागात १२ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकवर्षी बदल्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांना बदलीचे ठिकाण समजावे, त्यांना राहण्याची व्यवस्था व मुलांचा शाळा प्रवेश या प्रक्रिया करण्यास वेळ मिळावा, यासाठी बदल्यांची ही प्रक्रिया १५ मेपर्यंत राबविली जाते. यावर्षी बदलीच्या कक्षेत ४४० कर्मचारी होते. या सर्वांना सध्या नेमणुकीचे ठिकाण, बदली कोठे हवी व अन्य कामकाज याची सर्व माहिती तत्कालीन पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी मागविली होती. त्यानंतर ते कर्मचाऱ्यांशी संवाद साधून बदल्या करणार होते. मात्र तोपर्यंत त्यांचीच मुंबईला बदली. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. बदली कोठे होणार, अशी कर्मचाऱ्यांना धाकधुक लागून राहिली होती. अखेर सोमवारी बदल्यांचे ‘गॅझेट’ फुटले. अचानक गॅझेट फुटल्याने सर्वांनाच धक्का बसला. बदली झालेल्यांमध्ये सहायक पोलीस फौजदार ५७, हवालदार १३१, नाईक १२७ व शिपाई १२५ अशा ४४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी सध्या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहेत. पोलीस ठाण्यात पाच वर्षे असलेले, ज्यांचे सेवानिवृत्तीचे केवळ एक वर्ष राहिले आहे, वैद्यकीय कारण व पती-पत्नी शासकीय नोकरीत आहेत, असे चार निकष या बदल्यांमागे लावण्यात आले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सध्याचे ठिकाण सोडण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आता जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचाही खांदेपालट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांत नाराजीबदलीच्या कक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. केवळ त्यांनी दिलेल्या अर्जाच्याआधारे ही प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येकवर्षी पाच ते सहा दिवस ही प्रक्रिया सुरू असे. यावर्षी मात्र काही तासातच बदल्या झाल्या. पसंतीचे पोलीस ठाणे न मिळाल्याने अनेक कर्मचारी नाराज झाले आहेत.