शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

कारखान्यांकडे ४३९ कोटी अडकले

By admin | Updated: December 12, 2015 00:15 IST

ऊस बिलाचा तिढा : साखरसम्राट-संघटनांच्या संघर्षात शेतकऱ्यांची फरफट; शासनाची बघ्याची भूमिका

अशोक डोंबाळे -- सांगली --जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड-दोन महिने झाले असून, १७ लाख ८८ हजार ७८७ टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाचे ४३९ कोटी ७५ लाख ७४ हजार ४० रुपयांचे बिल साखर कारखानदारांकडे थकित आहे. शासनाने एफआरपीचा तोडगा काढला नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रूपयाही दिलेला नाही.जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २१ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधित सुरू झाला. त्याला जवळपास दीड ते दोन महिने झाले आहेत. वसंतदादा कारखान्याने सर्वाधिक दोन लाख १९ हजार ७७० टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याकडे चालू हंगामातील ५० कोटी ५४ लाख ७१ हजारांचे बिल थकित आहे. राजारामबापू, विश्वास, क्रांती, हुतात्मा साखर कारखान्यांचेही प्रत्येकी ३० ते ५० कोटींचे बिल थकित आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांची ४३९ कोटी रूपयांची बिले थकित आहेत. याबद्दल शासन, संघटना आणि कारखानदार एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. कारखानदार मात्र साखरेचे दर स्थिर नसल्यामुळे आणि एफआरपीविषयी शासनाने भूमिका स्पष्ट केली नसल्याने बिल दिले नसल्याचे सांगत आहेत. साखर कारखानदार, शासन आणि संघटनांच्या संघर्षात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारनेही एफआरपीच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याची गरज होती. परंतु, सरकार साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार आहे. सध्या लग्नसराई सुरू असून, घरातील लग्नकार्यासाठी खर्चाला पैसे नसल्यामुळे शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत आहेत. अनेक शेतकरी कारखानदारांचे उंबरे झिजवत असूनही बिल जमा होत नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकित रक्कमकारखाना (मे. टन) ऊस गाळपउतारा टक्के थकित रक्कमवसंतदादा२१९७७०९.६४५०५४७१०००राजारामबापू (साखराळे)११९७२०११.७१३१८६९४६४०विश्वासराव नाईक१५५९५०१०.२०३९६४२४९००हुतात्मा१६४९८५११.५५४२७९६१०००माणगंगा १६३७०८.३०३४३७७०००महांकाली५६५६०९.७८१३००८८०००राजारामबापू (वाटेगाव)११९०९५११.३०३०९६४७०००डफळे८१८४०९.९२१८८२३२०००सोनहिरा१५२८६२११.४४३८२१५५०००क्रांती२०२५६०११.२४५०६४०००००सर्वोदय९८३८०११.६३२४५९५००००मोहनराव शिंदे८८९३०१०.९६२१३४३२०००केन अ‍ॅग्रो९२०५०१०.२६२११७१५०००उदगिरी शुगर१०३४१०११.२२२५८५२५०००सदगुरु श्री श्री शुगर११६३०५१०.०९२६७५०१५००एकूण१७८८७८७१०.७८४३९७५७४०४०