शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:59 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ तळीराम सापडले आहेत. या तळीरामांविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सर्व तळीरामांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसातील ही कारवाई आहे.लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्चला आचारसंहिता लागली. तेव्हापासून जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दररोज दहा ते बारा तळीराम सापडत आहेत. सांगली आणि मिरज वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईत आघाडीवर आहेत. तळीरामांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. वाहने जप्त केली जातात. दुसऱ्यादिवशी न्यायालयात खटले दाखल करून त्यांना हजर केले जाते. गुन्हा कबूल केल्यास दोन हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड भरल्याची पावती घेऊन ती पोलिसांना दाखविल्यानंतर जप्त केलेले वाहन सोडले जाते.दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्यानंतर अटकेची कारवाई, वाहन चालविण्याचा परवाना निलंबित, रद्द, हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत. नशेत वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करूनही फरक पडला नाही. अनेकदा पोलिसांना पाहून काही तळीराम अन्य मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलीस २४ तास रस्त्यावर आहेत. संशयित वाहने तपासली जात आहेत. त्यावेळी नशेत वाहन चालविणारे तळीराम सापडत आहेत. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसात ४२५ तळीराम सापडले आहेत.