शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

सांगली जिल्ह्यामध्ये ४२५ तळीरामांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:59 IST

सचिन लाड । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी दररोज सुरू केलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल ४२५ तळीराम सापडले आहेत. या तळीरामांविरुद्ध जिल्हा न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सर्व तळीरामांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दि. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसातील ही कारवाई आहे.लोकसभा निवडणुकीसाठी १० मार्चला आचारसंहिता लागली. तेव्हापासून जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दररोज नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दररोज दहा ते बारा तळीराम सापडत आहेत. सांगली आणि मिरज वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईत आघाडीवर आहेत. तळीरामांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातात. वाहने जप्त केली जातात. दुसऱ्यादिवशी न्यायालयात खटले दाखल करून त्यांना हजर केले जाते. गुन्हा कबूल केल्यास दोन हजार रुपये दंड ठोठावला जातो. दंड भरल्याची पावती घेऊन ती पोलिसांना दाखविल्यानंतर जप्त केलेले वाहन सोडले जाते.दारूच्या नशेत वाहन चालविताना पकडल्यानंतर अटकेची कारवाई, वाहन चालविण्याचा परवाना निलंबित, रद्द, हे उपाय तळीराम चालकांना अद्याप लागू पडलेले नाहीत. नशेत वाहन चालविल्याने अपघाती मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करूनही फरक पडला नाही. अनेकदा पोलिसांना पाहून काही तळीराम अन्य मार्गाने पळून जाण्यात यशस्वी होतात. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून पोलीस २४ तास रस्त्यावर आहेत. संशयित वाहने तपासली जात आहेत. त्यावेळी नशेत वाहन चालविणारे तळीराम सापडत आहेत. १० मार्च ते १८ एप्रिल या एक महिना व नऊ दिवसात ४२५ तळीराम सापडले आहेत.