शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

किल्लेमच्छिंद्रगड डोंगरात पाच वर्षात ४ हजार रोपांची लावण, ठिबकने पाणी - शिवकुमार पाटील यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 21:39 IST

सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण... वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन.... झाडांना जगवण्यासाठी डोंगरावरच आरसीसी पाण्याच्या टाकीचे बांधकाम... यातून २५०० रोपांना ठिबकणे पाणी... झाडे लावण्याबरोबरच ती

शिरटे : सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण... वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन.... झाडांना जगवण्यासाठी डोंगरावरच आरसीसी पाण्याच्या टाकीचे बांधकाम... यातून २५०० रोपांना ठिबकणे पाणी... झाडे लावण्याबरोबरच ती जगवण्यासाठी सुरु असलेली धडपड... या झाडांसाठी किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलिया झटतोय... त्याच्या या प्रयत्नांना सलाम....!किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) शिवकुमार पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभुळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सितीफळ आदी देशीवानाच्या सुमारे ४ हजार वृक्षरोपांची लावण केली आहे. वृक्षसंगोपनासाठी आमदार जयंत पाटील यांनी २०० फुटापर्यंतचे बोअरवेल खुदाई करुन दिली होती. परंतु हे पाणी सर्व झाडांना पुरत नव्हते. पाण्याची कमतरता भासल्यानंतर पाटील यांनी स्वखर्चाने वाढीव बोअरवेल खुदाई केली. तेथून वरती पाईपलाईन केले आहे. वृक्षरोपांना पाणी देण्यासाठी डोंगरमध्यावर आरसीसी पाण्याची टाकी बांधुन २५०० रोपांना ठिबक केले आहे.

किल्लेमच्छिंद्रगड येथील पर्यटनस्थळी सुरु असलेल्या या उपक्रमाची वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी पहाणी केली. हुलवान म्हणाले की, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधला गेला नाही तर पृथ्वीचे रुप विराण होवुन सजिवाचे अस्तित्व धोक्यात येईल. सजिवाचे जगणे सुस' व्हावे यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपनाचे काम दिर्घकाळ होणे गरजेचे आहे. शिवकुमार पाटील यांची वृक्षसंवर्धनाची धडपड कौतुकास पात्र आहे.शिवकुमार पाटील म्हणाले, जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव देवुनही संबंधित यंत्रणेकडुन त्याची दखल घेतली जात नाही.सभापती सचिन हुलवान यांच्या समवेत संतोष इंगवले, प्रकाश साळुंखे, सुहास पाटील, सचिन साळुंखे, हणमंतराव मोरे, सिंकदर जमादार, राहुल पाटील उपस्थित होते. 

किल्लेमच्छिंद्रगडावर पूर्वी सिताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. परंतु काळाच्या ओघात वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली. सिताफळाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी पुढील वर्षापासून सिताफळाची मोठ्या प्रमाणात लावण करणार आहे. सिताफळाच्या बिजापासून रोपे तयार करणेचे काम चालू केले आहे.शिवकुमार पाटील, किल्लेमच्छिंद्रगड.