शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘एनए’ नियमाचा ४० टक्के क्षेत्राला लाभ

By admin | Updated: July 17, 2014 23:41 IST

शासनाचा निर्णय : महापालिका हद्दीतील १५ टक्के क्षेत्रच हिरव्या पट्ट्यात; उर्वरित रहिवासी लोकमत विशेष

अंजर अथणीकर - सांगलीघरबांधणीसाठी आवश्यक असलेली बिगरशेती (एनए) परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने, सांगली महापालिका क्षेत्रातील सुमारे ४० टक्के क्षेत्राला (रहिवासी क्षेत्र) याचा लाभ होणार आहे. महापालिका हद्दीतील केवळ १५ टक्केच क्षेत्र आता हिरव्या पट्यात (शेतीक्षेत्र) येत असल्यामुळे उर्वरित क्षेत्र नागरी वस्तीसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे एनएसाठी प्रस्ताव सादर केलेल्या सुमारे दहा हजार नागरिकांना तर लाभ होणार आहेच, शिवाय जमिनीचे दरही कमी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य शासनाने १ जानेवारी २००१ पूर्वी खरेदी झालेले गुंठेवारीचे प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना घर बांधणे अवघड झाले. जागा बगरशेती करुन मिळावी यासाठी सुमारे आठ हजार प्रस्ताव प्रशासकीय दरबारी प्रलंबित असून, सुमारे दोन हजार जणांनी तर बिगरशेती अवघड असल्यामुळे प्रस्तावच सादर केला नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सुमारे दहा हजार जणांना याचा फटका बसला होता. राज्य शासनाच्या नव्या नियमाने त्यांना आता दिलासा मिळाला आहे. २०१२ च्या विकास आराखड्यानुसार सांगली महापालिकेचे सुमारे ४० टक्के रहिवासी क्षेत्र बिगरशेती होण्यास मदत होणार आहे. जकात नाक्यापर्यंत महापालिकेची हद्द असली तरी, यामधील केवळ १५ टक्केच क्षेत्र हिरव्या पट्ट्यात (शेती) येत आहे. रहिवासी क्षेत्र वाढण्याबरोबरच बिगरशेतीची प्रक्रिया सुलभ होणार असल्यामुळे जमिनीचे दर कमी होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी शासनामार्फत स्वतंत्र अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता आहे. -महापालिकेच्या ४० टक्के रहिवासी क्षेत्रात घरे होण्यास मदत-बँकांच्या सहकार्याने घर बांधणीसाठी मदत -विकास निधी खर्चण्यास मदत -अपार्टमेंटऐवजी स्वत:च्या घर बांधणीला प्राधान्य-स्वमालकीच्या जागेचा विकास करणे शक्य-शेतकरी व खरेदीदार यांच्यामधील दलाल होणार कमीभ्रष्टाचाराचे कुरण संपेल-बिगरशेती करण्यासाठी दलालांपासून अधिकाऱ्यांपर्यंत साखळी कार्यरत आहे. याचे सुलभीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचाराचे कुरण संपेल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे शेती घटणार नाही, कारण महापालिकेने यापूर्वीच ते क्षेत्र रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आज ना उद्या हे क्षेत्र बिगरशेती होणारच आहे. उलट दलाल कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करता येईल व स्वत:ची जमीन स्वत:लाच विकसित करून चांगला दर घेता येईल. बिगरशेती परवाना देण्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय मुक्त करण्याचे अद्याप कोणतेच अध्यादेश आलेले नाहीत. शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. नियमानुसार आलेले नियमितीकरणाचे प्रस्ताव आपल्या विभागाकडे प्रलंबित नाहीत. यासंदर्भात नागरिकांना गुरुवारच्या बैठकीत सूचनाही देण्यात आल्या आहेत.- दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी, सांगली