शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

‘एनए’ नियमाचा ४० टक्के क्षेत्राला लाभ

By admin | Updated: July 17, 2014 23:41 IST

शासनाचा निर्णय : महापालिका हद्दीतील १५ टक्के क्षेत्रच हिरव्या पट्ट्यात; उर्वरित रहिवासी लोकमत विशेष

अंजर अथणीकर - सांगलीघरबांधणीसाठी आवश्यक असलेली बिगरशेती (एनए) परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने, सांगली महापालिका क्षेत्रातील सुमारे ४० टक्के क्षेत्राला (रहिवासी क्षेत्र) याचा लाभ होणार आहे. महापालिका हद्दीतील केवळ १५ टक्केच क्षेत्र आता हिरव्या पट्यात (शेतीक्षेत्र) येत असल्यामुळे उर्वरित क्षेत्र नागरी वस्तीसाठी उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे एनएसाठी प्रस्ताव सादर केलेल्या सुमारे दहा हजार नागरिकांना तर लाभ होणार आहेच, शिवाय जमिनीचे दरही कमी होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य शासनाने १ जानेवारी २००१ पूर्वी खरेदी झालेले गुंठेवारीचे प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना घर बांधणे अवघड झाले. जागा बगरशेती करुन मिळावी यासाठी सुमारे आठ हजार प्रस्ताव प्रशासकीय दरबारी प्रलंबित असून, सुमारे दोन हजार जणांनी तर बिगरशेती अवघड असल्यामुळे प्रस्तावच सादर केला नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सुमारे दहा हजार जणांना याचा फटका बसला होता. राज्य शासनाच्या नव्या नियमाने त्यांना आता दिलासा मिळाला आहे. २०१२ च्या विकास आराखड्यानुसार सांगली महापालिकेचे सुमारे ४० टक्के रहिवासी क्षेत्र बिगरशेती होण्यास मदत होणार आहे. जकात नाक्यापर्यंत महापालिकेची हद्द असली तरी, यामधील केवळ १५ टक्केच क्षेत्र हिरव्या पट्ट्यात (शेती) येत आहे. रहिवासी क्षेत्र वाढण्याबरोबरच बिगरशेतीची प्रक्रिया सुलभ होणार असल्यामुळे जमिनीचे दर कमी होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी शासनामार्फत स्वतंत्र अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता आहे. -महापालिकेच्या ४० टक्के रहिवासी क्षेत्रात घरे होण्यास मदत-बँकांच्या सहकार्याने घर बांधणीसाठी मदत -विकास निधी खर्चण्यास मदत -अपार्टमेंटऐवजी स्वत:च्या घर बांधणीला प्राधान्य-स्वमालकीच्या जागेचा विकास करणे शक्य-शेतकरी व खरेदीदार यांच्यामधील दलाल होणार कमीभ्रष्टाचाराचे कुरण संपेल-बिगरशेती करण्यासाठी दलालांपासून अधिकाऱ्यांपर्यंत साखळी कार्यरत आहे. याचे सुलभीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचाराचे कुरण संपेल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे शेती घटणार नाही, कारण महापालिकेने यापूर्वीच ते क्षेत्र रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आज ना उद्या हे क्षेत्र बिगरशेती होणारच आहे. उलट दलाल कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करता येईल व स्वत:ची जमीन स्वत:लाच विकसित करून चांगला दर घेता येईल. बिगरशेती परवाना देण्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय मुक्त करण्याचे अद्याप कोणतेच अध्यादेश आलेले नाहीत. शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. नियमानुसार आलेले नियमितीकरणाचे प्रस्ताव आपल्या विभागाकडे प्रलंबित नाहीत. यासंदर्भात नागरिकांना गुरुवारच्या बैठकीत सूचनाही देण्यात आल्या आहेत.- दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी, सांगली