शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
2
"क्या बड़ा तो सबसे दम बड़ा, राग आला की...", गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा; कर्मचाऱ्यांना मारहाण केली, लाखो रुपये पळवले
4
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
5
जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे
6
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
7
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
8
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
9
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
10
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
11
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
12
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
13
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
14
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
15
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
16
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
17
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
18
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
19
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
20
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

आटपाडी तालुक्यातील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST

तालुक्यात गेल्या वर्षी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

तालुक्यात गेल्या वर्षी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे, डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डाळिंबावर केलेला कोट्यवधीचा खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शासनाकडून मदत मिळेल ही आशा मात्र शेतकऱ्यांची फोल ठरली आहे. अद्याप दहा गावांतील शेतकऱ्यांना शासनाने मदत केलेली नाही. शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठ्ठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाची वाडी आणि झरे या गावातील तीन हजार ८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तीन कोटी चार लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.

चौकट

पावसाने झोडपले, शासनाने खेळविले!

गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत तीनवेळा अतिवृष्टी झाली. एकाचवेळी शंभर मि.मी पाऊस पडला. शेतीचे नुकसान झाले. दि. २९ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यास मान्यता देण्यात आली. दि. १ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय झाला. १४ नोव्हेंबर रोजी दिवाळी होती. त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. आता खरीप हंगामासाठी आर्थिक चणचण असल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी आहे.

कोट

आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडे निधीची मागणी कळविली आहे. स्मरणपत्रही दिले आहे. अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.

- सचिन मुळीक,

तहसीलदार, आटपाडी.