शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

जिल्ह्यात बारावीचे ३३ हजार, दहावीचे ४० हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची दि. २३ एप्रिल तर दहावीची ...

सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची दि. २३ एप्रिल तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिलपासून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. जिल्ह्यात बारावीसाठी ३३ हजार ९० विद्यार्थी तर दहावीसाठी ४० हजार ८४४ विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षेची सर्व ती तयारी झाली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.

शिक्षणाधिकारी कांबळे म्हणाले की, राज्य परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मे तर दहावीची दि. २९ एप्रिल ते दि. २९ मे दरम्यान होणार आहे. बारावीसाठी ४९ केंद्रे आणि ३३ हजार ९० परीक्षार्थी आहेत तर दहावीसाठी १०३ केंद्रे आणि ४० हजार ८४४ परीक्षार्थी आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने परीक्षेची सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. सात भरारी पथकांसह विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाढत्या कोरोनामुळे परीक्षेबाबत पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. परीक्षेची तयारी झाली आहे. पूर्वीप्रमाणे एका बेंचवर एक विद्यार्थी याप्रमाणेच बैठक व्यवस्था केली आहे. परीक्षेबाबत नवीन मार्गदर्शक कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करून घेऊ नये. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्रिका देणार आहे. त्यांनी वेळेत प्रवेशपत्रिका घ्याव्यात. जेणेकरून परीक्षेच्या दिवशी गोंधळ होणार नाही. विद्यार्थी आणि पालकांनी याची दक्षता घ्यावी.

चौकट

शाळांकडून शुल्कची सक्ती नको

जिल्ह्यातील काही अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्कची मागणी करीत आहेत. अनुदानित शाळांनी कोणतेही शुल्क आकारायचे नाही. नियमानुसार शुल्क घेता येत नाही, कोणी शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर कडक कारवाई केली जाईल, शुल्कसाठी अडवणूक होत असेल तर पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी कांबळे यांनी केले. खासगी शाळांनीही शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, असे आवाहन कांबळे यांनी केले.